धुळे – धुळेमधील साक्रीतील महिलेच्या मृत्यूची जी दुर्दैवी घटना घडली, त्याबाबत आमच्याही सहवेदना आहेत. परंतु मृत्यूचे भांडवल करुन भाजपा नेते व कार्यकर्त्यांना यामध्ये नाहक गोवण्याचे प्रयत्न काही मंडळींकडून केला जात आहे. याप्रकणात महाविकास आघाडी सरकार दबावतंत्राचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात याप्रकरणाचा पर्दाफाश करणार असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
धुळे येथील शासकीय विश्रामगृह येथे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलतना दरेकर यांनी सांगितले की, साक्री नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधा-यांची ४० वर्षाची सत्ता उलथून लावत भाजपाने बाजी मारली. मात्र नगरपंचायत निवडणुकीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला व या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु याप्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्यांना नाहक गोवले जात आहे. त्यामुळे आज याप्रकरणाच्या अनुषंगाने आपण अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव भेट घेतली व या प्रकरणाचा तपास पारदर्शकपध्दतीने करण्याची मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले की, साक्रीतील महिलेचा मृत्यू झाला. हे निश्चितच दुदैर्वी आहे, परंतु मृत्यूचे भांडवल करुन भाजपच्या पदाधिका-यांना जर याप्रकरणात नाहक गोवले जात असेल तर ते सहन केले जात नाही. पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून सरकारकडून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही महाविकास आघाडी सरकारचा चुकीचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी खासदार हिना गावीत तेथेच होत्या. त्यांना घटनाक्रम माहित असून मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल अजुन उघड झालेला नाही. असे सांगतानाच दरकेर म्हणाले की, साक्रीमध्ये भाजपने सत्ता काबीज केली हीच येथील विरोधकांची पोटदुखी आहे. अॅड. भोसले यांना याप्रकरणात गोवता येईल का? यासाठी प्रयत्न करण्यात आले. साक्रीतील पराभवानंतर देखील सत्तेसाठी काही बेबनाव करता येते का? असाही महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या तपासावर आमचा आक्षेप नाही. मात्र राज्य सरकारकडून दबाव आणला जात असेल तर आम्हीच याप्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी कोर्टातही करु असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.
साक्री प्रकरणाची सीबीआय तपास आणि न्यायालयात पारदर्शक सखोल तपास करावा अशी आमची मागणी असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, आगामी अधिवेशनात या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे.
किराणा दुकानामधून वाईन विक्रिया निर्णय चुकीचा आहे. शेतकऱ्यांच्या भल्याचे कारण ते पुढे करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर ठेवून हे सरकार कुणाचे भले करत आहे हे सर्वांना माहित आहे असा आरोप करतानाच दरेकर यांनी सांगितले की, गारपीट, पुर, वादळ नैसर्गिक आपत्तीमधील नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकराने फुटकी कवडी दिली नाही, तसेच या शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली नाही. परंतु आपले पाप लपविण्यासाठी वाईनचे कारण सरकारकडून पुढे केले जात आहे. कोविडच्या संकटाच्या काळात जे सरकार वैदयकीय सुविधा, आवश्यक औषधे देऊ शकले नाहीत तेच आता जनतेला वाईन देत आहेत. हे सरकार आता महाराष्ट्रालाच बेवडे करायला निघालात का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
वाईनच्या मुद्यावरून सरकार इतर राज्यांशी तुलना का करते असा सवालही त्यांनी केला.मुळात सरकारचे धोरण असेच आहे की प्रश्न एक विचारला की उत्तर दुसरे द्यायचे, उत्तर देण्याचे सरकारमध्ये धाडस नाही असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी खासदार. डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारच्या खासदार.डॉ.हिना गावीत, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शिवाजीराव दहिते, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी आदी उपस्थित होते.
निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यामुळेच साक्री’ प्रकरणात सरकारकडून दबावतंत्र विधीमंडळात या प्रकरणाचा पर्दाफाश करणार-प्रवीण दरेकर
Date:

