Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संतांचे वाड्.मयच जीवनात सकारात्मकता आणते

Date:

कीर्तनभूषण ह.भ.प. पूजा देशमुख ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : समर्थ रामदास स्वामींनी आदर्श जीवनपद्धती सांगितली आहे. दासबोधात याबाबत सुरेख मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात मिळते. मनाच्या श्लोकांतून समर्थांनी मनाला बोध दिला आहे. असे संतांचे वाड्.मय फक्त पाठांतराकरीता नसून आचरणाकरीता आहे. ख-या अर्थाने जीवनात सकारात्मकता आणणारे संतांचे वाड्.मय आहे, असे मत ह.भ.प. पूजा देशमुख यांनी व्यक्त केले. 
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 
ह.भ.प.पूजा देशमुख म्हणाल्या, हरिभक्ती आचरताना कोण काय म्हणेल, याचा विचार भक्त करीत नाहीत. हरिभक्तीत जे आपले आयुष्य सार्थकी लावतात, तेच जीव धन्यता मिळवितात. संतांच्या अनेक गोष्टी, विचार, साहित्याकडे दुर्लक्ष होत असून संतांचे वाड्.मय हीच आपली खरी संपत्ती आहे. परमार्थिक वृत्ती घडविण्याचे काम हरिभक्ती करते. 
त्या पुढे म्हणाल्या, गरीबाची झोप ही ख-या अर्थाने श्रीमंत असते. मात्र, श्रीमंताला अनेक चितांमुळे झोप येत नाही. मनाचा संतोष हा हरिभक्तीमध्ये असतो. मनाचा संतोष हे आपले भाग्य, धन आणि परमेश्वर आहे. त्यामुळे जीवनात धन्यता मिळण्यास हरिभक्तीशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...