स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आज नितांत गरज – डॉ. एस. एन. पठाण

Date:

नारायणगांव ;- सध्या देशात आमच्यावर अन्याय होतो म्हणून एक गट मोर्चा काढतोय तर दुसरा गट प्रतिमोर्चा काढून आधिच्या गटाचे म्हणने चुकीचे आहे असे सांगतो. विशेष म्हणजे युवकांच्यामध्ये सुद्धा या मोर्चा प्रतिमोर्चाची लागण झाली आहे, ही गंभीर बाब आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे असे महत्त्वपूर्ण उद्गार डॉ. एस. एन. पठाण यांनी नारायणगांव, ता. जुन्नर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त बोलतांना काढले.
नारायणगांव येथील ‘धर्मवीर संभाजी पतसंस्था’, ‘भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट’ व ‘समविचारी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणे चे सल्लागार डॉ. एस. एन. पठाण यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी व्यासपीठावरून ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. एस. एन. पठाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांना “वेदांन्तिक मेंदू आणि इस्लामिक देह’ असा माणूस अपेक्षित होता व तो भारताचा सुवर्णकाळ असेल असे ते म्हणाले होते. इस्लाममधील समानतेवर आधारलेली समाजरचना त्यांना हवी होती. आज देशात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे अशावेळी आपली भारतमाता विश्‍वगुरू कशी बनेल? असा विचार डॉ. पठाण यांनी मांडला. स्वामी विवेकानंदांनी “आयुष्यभर संघर्ष नको – परस्परांना सहाय्य करा, आत्मसात करा – विनाश करू नका, कलह नको, मैत्री हवी, शांती हवी” हाच विचार राबवला व म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे असे डॉ. पठाण म्हणाले.
राजमाता जिजाऊंच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा आदर्श
राजमाता जिजाऊंच्या बद्दल बोलतांना डॉ. पठाण म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्यामध्ये प्रदान केलेली सर्व मानवी ऊर्जा संस्काराने विकसित करण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे राज्य म्हणजे ‘मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा आदर्शच’ म्हणावयास हवे. मातृसत्ताक कुटुंब पद्धती जगात विश्‍वशांती निर्माण करू शकेल हे त्यांनी अनेक उदाहरणाने पटवून दिले.
कार्यक्रमास नारायणगांवचे सरपंच श्री. योगेश (बाबु) पाटे, श्री. अमित बेनके, श्री. वसंतराव देशमुख, श्री. अनिल डेरे, श्री. दिपक वारूळे, श्रीमती संगिता बेहनजी, श्री. रविंद्र वाघोले, इ. मान्यवर उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...