वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी चिंतेचा विषय-आरोग्यमंत्री राजेश टोपे

Date:

वाढती रुग्णसंख्या सरकारसाठी चिंतेचा विषय, हे रोखण्यासाठी जे गरजेचे आहेत ते सरकारकडून केले जातेय.लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेतला जात नसतो.माध्यमांशी संवाद साधत असताना राजेश टोपे म्हणाले की, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आणि गरजेचे आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधने कमी पडू शकतात अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊन लावण्याची हौस कुणालाही नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. तो अभ्यास करण्याचा विषय असतो. पण आपली संसाधने जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,’ असे टोपे या वेळी बोलताना म्हणाले.

आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील रुग्णसंख्या का वाढत आहे याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, ‘रुग्णसंख्या वाढणे हा चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे. मात्र लोकांचा निर्धास्तपणा हाच रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळायला हवेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नयेत तसेच विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केले पाहिजे’

पुढे बोलताना टोपे म्हणाले की, ‘लॉकडाऊन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. म्हणजेच जर निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करावे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्या अभ्यासाच्या माध्यमातून, परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात नसतो.’ असे राजेश टोपे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...