Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले ः बाबा कांबळे

Date:

  • रॅपिडो बंदच्या निर्णयाचा भंडारा उधळून रिक्षा चालक मालकांनी केला आनंदोत्सव

पिंपरी / प्रतिनिधी

काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम केले. मात्र आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने देखील सोडविता येतात, ही भूमिका आम्ही घेतली. रॅपिडोच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीविरोधात न्यायालयात दाद मागितली. रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयाची देखील लढाई आम्ही जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय असून लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

रॅपिडो कंपनीच्या प्रवासी वाहतूकीवर बंदी घालण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशाचे स्वागत करत पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालक मालकांनी केले. या वेळी रिक्षा चालकांनी भंडाऱ्याची उधळण केली. तसेच पेढे वाटून, फटाक्‍यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला बाबा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाबा कांबळे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर पिंपरी चिंचवड, पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने झाली आहेत. काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांच्या अडचणींचा फायदा घेत आंदोलनाचा चुकीचा मार्ग अवलंबला होता. आक्रमक आंदोलनाचा मार्ग निवडला होता. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. परंतु महाराष्ट्र रिक्षा पंचायतने या चुकीच्या गोष्टीला विरोध केला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे शासनाकडे मांडण्याची भूमिका घेतली. संविधानिक मार्गाने आंदोलन करून देखील न्याय मिळतो ही भूमिका रिक्षा चालकांना पटवून दिली. कालांतराने ते सिद्ध देखील करून दाखवले.

रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आव्हान देणारी इंटरप्रिटेशन याचिका महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर मित्र संघटनांनी केली. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. न्यायालयातील लढाई जिंकण्याचे आव्हान होते. मात्र रिक्षा चालकांची वकिलांमार्फत योग्य भूमिका लावून धरली. अडचणी सांगितल्या. त्यामुळे न्यायालयाने देखील रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपिडोवर बंदी घातली. ही लढाई ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालक मालकांच्या आयुष्यात मोठा बदल आला असून या निर्णयाचा फायदा देशभरातील 15 कोटी रिक्षा, टॅक्‍सी, बस टू व्हीलर यांना होणार आहे. तर महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक-मालकांना याचा फायदा होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रिक्षा व टॅक्‍सी सेवा या कायदेशीर आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नोंदी नाहीत, परमीट नाही, परवाना नाही. मग प्रवासी वाहतूकीला परवानगी कोणी दिली असे न्यायालयाने संबंधीतांना फटकारले, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.

पुढील लढाई अधिक व्यापक असणार आहे. अनेक मागण्या रखडलेल्या आहेत. त्या देखील कायदेशीर मार्गानेच सोडवू, असे बाबा कांबळे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

.

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...