गाव-खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन गरजेचे – रवींद्र धारिया

Date:

पुणे: लॉकडाऊनवेळी  मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अनेक गावांतील माणसांचे परत स्थलांतर झाले आहे. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे “खेड्याकडे चला” हा वनराईच्या कामाचा मोठा पैलू आहे. याद्वारे गावातील व्यक्तींना गावामध्येच रोजगार निर्माण होऊन गावाचा विकास कसा साधता येईल यावर वनराई भर देत आहे. गावातील मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे असून वनराई संस्था ग्रामीण विकासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. गावातील पाणी प्रश्न, शिक्षण आणि आरोग्य प्रश्न तसेच लोकांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी काम सुरू आहे. प्रत्येक संकटात संस्थेचे कार्यकर्ते सातत्याने झोकून काम करत असतात. त्यामुळे सर्व संस्थानी एकत्र येऊन काम केले तर सगळया संस्थेचे ज्ञानात भर आणि ताकद वाढेल. समाजाची नाळ जोडलेली आहे ती तुटता कामाने ही महत्त्वाची बाब लक्षात ठेले पाहिजे.”असे मत वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी रविवारी व्यक्त केले.

अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात” वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देण्यात आला यावेळी ते बोलत होते. तसेच माजी राज्य जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्याचे माजी तुरुंग महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्काराचे वितरण झाले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वीस जणांना ‘समाजरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धोंडीराम जवान आदी उपस्थित होते.

धारिया म्हणाले, हा पुरस्कार माझा सन्मान नसून गावा गावात जे माझे सहकारी काम करतात त्यांचा हा बहुमान आहे. तसेच लहान मुलांमध्ये आणि शाळेतील मुलांमध्ये पर्यावरणबद्दलचे संस्कार घडावे यासाठी गेली २० वर्ष विविध स्पर्धेचे आयोजन करून पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, कोरोनाच्या महामारी मध्ये संपूर्ण राज्य, देश, जग कोरोनाग्रस्त झाले होते. शासन आणि प्रशासन काम करत असताना विविध सामाजिक संस्थाने सातत्याने लोकांच्या अडचणी समजुन घेऊन त्यांना शक्य तेवढी मदत केली. त्यामुळे समाजातील विविध संघटनांचे काम कौतुकास्पद आहे. जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात त्यातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो.”

विठ्ठल जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात-परराज्यामध्ये विविध संस्थानतर्फे अन्न धान्य वाटप, सॅनिटाईज, मास्क, रक्तदाब शिबिरे आयोजित करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या विविध सामाजिक संस्था व्यक्ती मध्ये सामाजिक संवेदना आणि माणुसकी जिवंत आहे याची जाणिव  होते. हे चांगलं समाज रचनेसाठी चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक आहे. या संस्थेचे काम हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जीवनामध्ये स्वतःसाठी काय मिळवले यापेक्षाही दुसऱ्यासाठी काय करू शकलो यांचा आनंद खुप मोठा आहे. 

शेखर मुंदडा म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात फेडरेशनसह सर्व सामाजिक संस्था एकत्रित करून तीन लाख लोकांना मदत दिली. त्यामुळे सर्व संस्था एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे अधिक गरजूंना मदत करण्यासाठी सोपे होईल. जेव्हा एखाद्या पुरस्काराने आपण सन्मानित होत असतो त्यावेळेस अजून काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारी वाढते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...