४७ जागां ऎवजी ओबीसींसाठी फक्त ४६ जागांवर आरक्षण; राजकीय पक्षांना का जाग येईना ?

Date:

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७३ झाली असून ओबीसींसाठी नियमानुसार २७ टक्के म्हणजे ४७ जागा आरक्षित ठेवणे भाग असताना ४६ च जागा ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत तर आहे पण राजकीय पक्षांना आता का जग येईना ? असाही सवाल केला जातो आहे.

सुमारे दीड वर्षापासून राजकीय आरक्षण गमावलेल्या इतरमागास वर्गीय [ओबीसी] समाजाला, जयंत बांठिया आयोगाच्या शिफारशी नुसार २७ % आरक्षण बहाल करण्यात आले.मागील २०१७ च्या मनापा निवडणुकीत पुण्यात १६२ जागा होत्या त्यावेळीही २७% च्या प्रमाणानुसार ४३.७४ म्हणजे ४४ जागांचे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला मिळणे असे अपेक्षित होते , मात्र त्यावेळीही ओबीसींना १ जागा कमी देण्यात आली होती.यावेळी ३४ गावे नव्याने मनापा मध्ये समाविष्ट झाल्यामुळे नगरसेवकांची एकूण संख्या १७३ झाली आहे .१७३ जागांपैकी २७ % जागा या ओबीसी समाजासाठी आरक्षित असणार आहेत, मात्र यावेळी सुद्धा टक्केवारीच्या प्रमाणत येणारी संख्या अपूर्णांकात आहे , नियमानुसार ४६.७१ जागांवर ओबीसी आरक्षण आहे . जेंव्हा अपुर्णांकी संख्या ०.५ पेक्षा अधिक असते तेंव्हा त्यापुढील संख्या पूर्णांकात धरली जाते . ४६ पूर्ण आणि ०.७१ ही अपूर्णांकी संख्या आहे .०.७१ ही संख्या अर्ध्यापेक्षा अधिक मुल्यांची असल्यामुळे , नियमा प्रमाणे १ पूर्ण जागा देणे अनिवार्य आहे . तरीही निवडणूक आयोग याही वर्षी ४७ जागा आरक्षित ठेवण्या ऐवजी ४६ जागीच ओबीसींना आरक्षण दिले आहे .

आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे . बांठीया आयोगाच्या अहवालाचे टंकलेखन सुरु असताना शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आले . सत्तेवर असताना ओबीसी आरक्षण मिळाले, हा धागा पकडून शिंदे – फडणवीस सरकारने ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून आरक्षणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला .अपुर्णांक संख्येचे गणित पुण्या बरोबरच अनेक ठिकाणी चुकत आहे , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी समाजाला आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळत नाही .

पुण्याप्रमाणे अनेक ठिकाणी अशी परस्थिती आहे . अनेक ठिकाणी ओबीसी समाजाला एक जागा कमी मिळत असेल, तर हा ओबीसी समाजावर अन्याय आहे , असे मत आपचे विजय कुंभार यांनी व्यक्त केले आहे . मात्र श्रेयासाठी सगळ्यात पुढे असणाऱ्या राजकीय पक्षांची या प्रश्नाबाबत अनास्था दुर्दैवी आहे .
आम आदमी पक्ष या प्रश्ना बाबत पाठपुरावा करून ओबीसी समाजाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत लढत राहील , असे आपचे राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...