Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज व गाडगेबाबा  भारतीय संस्कृतीचे खरे रक्षक

Date:


खासदार श्रीनिवास पाटील यांचे विचार ः विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण

पुणे, दि. ३० जानेवारी:“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे खरे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. या देशाला स्वच्छतेच्या मंत्राबरोबरच माणसात देव शोधावा असा संदेश त्यांनी दिला आहे.”असे विचार सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानवतेचे महान पुजारी तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना व अनावरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड, नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा व योगेंद्र मिश्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ व डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळयाला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. तसेच, उल्हास पवार लिखित ‘ महात्मा गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीनिवास पाटील म्हणाले,“ या दोन्हीं संतांचा जन्म व मृत्यू अमरावतीत झाला. यांनी मानवतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून जी २० साठी विदेशातून येणार्‍या पाहुण्यांना या विश्वशांती घुमटाला भेट देण्याची विनंती करणार आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ साधू संतांच्या या भूमीत दोन्हीं संतांनी संपूर्ण मानवजातीला सुखी होण्याचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत माता ही विश्वगुरू म्हणून उदयास येईल. तसेच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. ”
उल्हास पवार म्हणाले,“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा उल्लेख मृत्यूंजय म्हणून करावा. कारण त्यांचे विचार हे मानव जातीला तारणारे आहेत. करूणा, दया, क्षमा आणि शांती याचा खरा अर्थ जाणून त्याचा अभ्यास करावा. आज राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या सारखे क्षमाशिला बनण्याचा संकल्प करावा.”डॉ. मंगेश कराड म्हणाले, संतांनी देशाला विचार दिला. त्यांच्यामुळे आम्ही विकास करू शकलो.  संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि ग्राम स्वच्छतेचा विचार दिला. राष्ट्रसंतांच्या विचाराने आपल्या गावात कार्य सुरू करावे. त्यांच्या विचाराने गावाचा विकास आणि नावलोकिकात वाढ होईल.
रमेश ठाकरे म्हणालेः“ संतांचे विचार नम्र व आचरणात आणण्यासाठी आहेे. शून्य आणि पुण्यांतून प्रगती होते. आज शुन्यातूनच विश्व निर्माण करावयाचे आहे. घुमटाच्या माध्यमातून  डॉ. कराड यांनी क्रांती केली आहे.”
प्रा.रतनलाल सोनाग्रा म्हणाले,“राष्ट्रपिता महात्मा गांधी भारत देशाची भाषा आहे.  त्यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला आहे. वर्तमाना काळात माणसाच्या हदयात माणूस शोधा हा संदेश तुकडोमहाराज व संत गाडगेबाबा यांनी दिला आहे. त्यांचे पुतळे उभारूण संपूर्ण समाजाला मानवतेचा संदेश दिला आहे.”
यानंतर ज्ञानेश्वर रक्षक, अरविंद राठोड  योगेन्द्र मिश्रा, डॉ. संजय उपाध्ये आणि पं. वसन्तराव गाडगीळ यांनी आपले विचार मांडले
डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्री गुरूदेव सेवामंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...