जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

Date:

 

समाजमनातून हिंसा ;अहंकार काढून टाकल्यास मॉबलिंचिंगसारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत.

मुंबई- प्रत्येकाला माणसाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करून इतरांशी स्नेह;प्रेम; शांती;समता ; आणि अहिंसा या बुद्ध तत्वज्ञानाने दिलेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करून वागल्यास कोणीही सूडबुद्धीने हल्ले करणार नाही. समाजमनातून हिंसा आणि अहंकार मिटविल्यास मॉबलिंचिंग सारख्या हिंसक घटना घडणार नाहीत. भारताला अधिक शक्तीशाली होण्यासाठी बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांची गरज आहे. जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शाहिद स्मारक येथे आयोजित 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्मसंमेलनात रामदास आठवले बोलत होते. यावेळी बौद्ध भिक्खू संघाला ना.रामदास आठवले यांच्या हस्ते चिवरदान करण्यात आले. यावेळी पूज्य भन्ते डॉ राहुल बोधी महाथेरो यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होते. राज्यमंत्री ना अविनाश महातेकर; गौतम सोनवणे; रिपाइं डी. एम चव्हाण;बाळासाहेब गरुड; काकासाहेब खंबाळकर; आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
तथागत भगवान बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म दिला आहे. बौद्ध धम्म हा अखिल मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे. बौद्ध धम्म शांतताप्रिय ; समतावादी; वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा परिवर्तनवादी बौद्ध धम्म आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात धम्मक्रांती घडविली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली याचा आम्हाला अभिमान आहे असे  रामदास आठवले यावेळी म्हणाले.
नुकताच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे असे सांगत जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे महत्व सांगितले होते याची आठवण करून देत रामदास आठवले यांनी केवळ भारताच्या प्रगती साठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या हितासाठी बुद्धांनी दिलेला अहिंसा आणि शांती चा विचार आवश्यक आहे असे मत मांडत 63 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...