Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी नाव हटवले, आता मेजर ध्यानचंद नावाने दिला जाणार हा पुरस्कार

Date:

नवी दिल्ली -केंद्र सरकारने शुक्रवारी खेळांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. या निर्णयाची घोषणा करताना मोदी म्हणाले की, हा पुरस्कार आपल्या देशातील लोकांच्या भावनांचा आदर करेल.मोदी म्हणाले- ध्यानचंद हे भारताचे पहिले खेळाडू होते, ज्यांनी देशाला सन्मान आणि गौरव दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावावर असावा.

खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला  आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतला अभिमान आणि सन्मानाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या खेळाडूंमध्ये  मेजर ध्यानचंद हे अग्रगण्य होते. आपल्या देशाच्या सर्वोच्च  क्रीडा सन्मानाला त्यांचे नाव देणे उचित होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. संपूर्ण देशभरात हॉकी प्रती नव्याने रुची निर्माण होत आहे. येत्या काळासाठी हे अतिशय सकारात्मक चिन्ह आहे, असे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. त्यांच्या भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला  आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल.ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नाने देशाचे मन जिंकले आहे. विशेषकरून हॉकी मध्ये आपल्या मुला-मुलीनी जी इच्छाशक्ती,जिंकण्यासाठीची झुंजार वृत्ती  यांचे घडवलेले दर्शन वर्तमान आणि येत्या काळासाठी मोठी प्रेरणादायी आहे.देशाला अभिमानास्पद अशा या क्षणी खेल रत्न पुरस्काराला  आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जावे अशी जन भावना व्यक्त करण्यात येत होती. या लोक भावनेचा आदर करत या पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत आहे.

1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 1991-92 मध्ये सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली होती. विजेत्या खेळाडूला प्रशस्तीपत्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात. पहिला खेल रत्न पुरस्कार प्रथम भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. आतापर्यंत 45 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अलीकडेच क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरालिम्पियन हाय जम्पर मरिअप्पन थंगावेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पैलवान विनेश फोगाट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

3 हॉकीपटूंना मिळाला खेलरत्न पुरस्कार
आतापर्यंत 3 खेळाडूंना हॉकीमध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यात धनराज पिल्ले (1999/2000), सरदार सिंह (2017) आणि राणी रामपाल (2020) यांचा समावेश आहे.

ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते
मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज येथे झाला. भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले. ड्युटीनंतर ते चांदण्याच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्यांना ध्यानचंद म्हटले जाऊ लागले. त्याच्या खेळामुळे भारताने 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली. 1928 च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सर्वात जास्त 14 गोल केले. मग एका स्थानिक वृत्तपत्राने लिहिले, ‘हा हॉकी नाही, जादू होती आणि ध्यानचंद हा हॉकीचा जादूगार आहे.’ तेव्हापासून त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाऊ लागले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...