मुंबई-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माघार घ्यावी असे म्हटले होते. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आज पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याबाबत घोषणा केली. त्यानंतर यावर राज्यात टीका-टीप्पणी सुरू आहे. त्यातच संजय राऊत यांनीही आज नवा दावा केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्क्रिप्टचा एक भाग होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्वतंत्र सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने विजयी होईल हे स्पष्टपणे भाजपला समजले, पराभव समोर दिसत असल्यानेच भाजपने निवडणुकीतून माघार घेतली असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने यासाठी स्वतंत्र सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला कळाले. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला.भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रीया आली. भाजपने आपला निर्णय जाहीर केला. त्यावरून आज संजय राऊत यांनी भाजपने या पोटनिवडणुकीसाठी सर्वे केला होता ही बाब सांगत पराभव समोर दिसत असल्याने माघार घेतल्याची शंका व्यक्त केली
राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेले पत्र स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत
Date:

