लोकप्रतिनिधींना तुरुंगात डांबून ,संविधानाचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकीकरन होत नाही -राहुल गांधी

Date:

नवी दिल्ली –  जम्मू-काश्मीरला तुकड्यांमध्ये विभागून, प्रतिनिधींना तुरुंगात डांबून आणि संविधानाचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकीकरण होत नाही. तसेच हा देश जमिनीच्या भूखंडाने नाही तर येथील लोकांच्या विचाराने बनला आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे सांगत राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या अनुच्छेद 370 हटवण्याचा प्रकरणावर मंगळवारी मौन सोडले.

अमित शहांनी कलम 370 रद्द करण्याबाबत केली होती शिफारस
गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनुच्छेद 370 आणि 35 ए हटवण्याबाबत राज्यसभेत शिफारस केली होती. यानंतर सरकारने जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. आता जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. दरम्यान योग्य वेळ आल्यानंर या केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केले.

राज्याचे पुनर्गठन करण्यात येत होत्या अडचणी
अनुच्छेद 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला होता. संसदेतील कोणतेही कायदे या राज्याला लागू होत नव्हते. यामुळे जम्मू-काश्मीर राज्याचे पुनर्गठन करता येत नव्हते त्यामुळे ते हटवण्यात आले.

समर्थनार्थ 125 तर विरोधात 61 मते मिळाली
केंद्र सरकार सुरक्षा, विदेश आणि वाहतून यांसारखे महत्वाचे विषय सोडून राज्यातील इतर प्रकरणार दखल देऊ शकत नव्हते. जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा सोमवारी राज्यसभेत संमत करण्यात आले. या कायद्याच्या समर्थनार्थ 125 तर विरोधात 61 मते पडली. जम्मू-काश्मीर दिल्लीप्रमाणे विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश होणार आहे. तर लडाखमध्ये विधानसभा नसणार.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...