पीएम, अर्थमंत्र्यांनीच ओढावले देशावर आर्थिक संकट; राहुल गांधींचा आरोप

Date:

नवी दिल्ली – देशावर आर्थिक संकट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनीच आणले. आता त्यांना यातून कसे बाहेर पडावे ते सूचत नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. सोबतच, भारतीय रिझर्व्ह बँकेतून चोरी करून चालणार नाही असा टोला देखील माजी काँग्रेस अध्यक्षांनी लगावला आहे. आरबीआयने नुकतेच आपल्या राखीव (रिझर्व्ह) फंड्समधून 1 लाख 76 हजार कोटी रुपये सरकारला सुपूर्द केले. भारत सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देण्यास मंजुरी मिळाल्याचा हा एक विक्रमच आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना राहुल यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

राहुल यांनी ट्विट करून म्हटले, की “पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना स्वतःच आणलेल्या आर्थिक संकटाची उकल काढता येत नाही. अशात आरबीआयमधून चोरी करून चालणार नाही. हे तर असेच झाले, की जणु गोळी लागली आणि जखम भरण्यासाठी एखाद्या डिस्पेंसरीतून बँडेज चोरली.” आरबीआयने विमल जालान समितीच्या शिफारसींवर अंमलबजावणी करत सोमवारी विक्रमी 1.76 लाख कोटी रुपयांचा आरक्षित / राखीव निधी सरकारला सुपूर्द केला आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला देशास आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मदत होईल असे सांगितले जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, रिझर्व्ह बँकेचे रिझर्व्ह फंड सरकारला देण्यावर विचार करण्यासाठी समिती 2018 मध्ये स्थापित करण्यात आली होती. त्यानंतरच तत्कालीन आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आणि काही महिन्यांतच रिझर्व्ह फंड सरकारला ट्रांसफर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...

उद्योगांच्या तत्पर वीजसेवेला महावितरणच्या ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टलने नवी ऊर्जा

तक्रार निवारणाचा वेगही सुसाट; दर्जेदार सेवेचे दमदार पाऊल २७८ औद्योगिक संघटना...

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...