Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राहुल बजाज सदैव स्मरणात राहतील- पंतप्रधान

Date:

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“वाणिज्य आणि उद्योग जगतासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राहुल बजाज सदैव स्मरणात राहतील. व्यापारविश्वाच्या पलीकडे देखील त्यांना समाजसेवा करण्याची अत्यंत आवड होती. ते एक अत्यंत संभाषणचतुर व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने मी अत्यंत दुःखी झालो आहे. बजाज यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी देशासाठी दुःखद आहे. त्यांच्या निधनाने औद्योगिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या निर्मितीत त्यांनी पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेले. ते केवळ यशस्वी उद्योजकच नव्हते तर त्यांची विचारांची दिशा स्पष्ट होती. राज्यसभेत त्यांनी उत्तम काम केले. ते आग्रही आणि अभ्यासू पद्धतीने विषयाची मांडणी करीत. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
-खासदार प्रकाश जावडेकर

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे संपूर्ण देशातील प्रमुख क्षेत्र आहे. राज्याला हे स्थान मिळण्यामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगसमुहामार्फत केलेले काम खूप मोलाचे आहे. बजाज ऑटोचे पन्नास वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे – पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची अपरिमित हानी झाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन केवळ उद्योग क्षेत्रासाठीच नाही तर सामाजिक क्षेत्रासाठीही धक्कादायक आहे. उद्योग व्यवसायाचा पसारा वाढवताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. सामानांच्या वाहन खरेदीची स्वप्नपूर्ती करतानाचा त्यांनी देशाच्या वाहन उद्योगासाठी दिलेले योगदान जगाच्या नकाशावर भारताला ओळख मिळवून गेले. बजाज यांना समस्त पुणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

पाच दशकांहून अधिक काळ राहुल बजाज यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणले. भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही ‘हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती देवो.
– सुभाष देसाई, उद्योगमंत्री

महाराष्ट्रासह देश आणि संपूर्ण जगात राहुल बजाज यांनी आपली ओळख निर्माण केली होती. राज्यसभेचे सदस्य म्हणून 2006 ते 2010 च्या दरम्यान निवडून गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि राहुल बजाज चांगला संवाद आणि मैत्री होती. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्रावर संकटे आली त्यावेळी ते मदतीसाठी धावून आले.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

फिरोदिया कुटुंबामुळे राहुल बजाज यांच्याशी माझी ओळख झाली. नवलमलजी फिरोदिया जे बजाज ऑटो बघत होते, त्यांनी कमलनयन बजाज यांना विचारले की राहुल परदेशातून शिकून आला आहे, तर त्याला काहीतरी काम दिले पाहिजे. मग फिरोदिया यांनी त्यांना बजाजमध्ये बसवले. तेव्हापासून त्यांचे काम सुरू झाले. राहुल बजाज यांचे काका रामकृष्ण यांच्यामुळे शरद पवार यांचा राहुल यांच्याशी संबंध आला. यातूनच एकमेकांचा स्वभाव आवडला म्हणून आमची मैत्री फुलत गेली. आमच्या बैठका व्हायच्या आम्ही अनेकदा भेटायचो. ते मला धाकट्या भावासारखे मानायचे. त्यांचे विकसनावर अधिक लक्ष असायचे. त्यांनी मुलांनाही तसेच शिक्षण दिले. राजीव आणि संजीव यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. ते परखडपणे त्यांचे मत मांडायचे. अर्थशास्त्र त्यांचा विषय होता. एखाद्या विषयात धोरण चुकले असेल तर त्यावर ते कोणाचे सरकार आहे याचा विचार न करता ते मत मांडत असत.
– विठ्ठलशेठ मणियार, स्नेही-मित्र

देशाच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचा वाटा मोठा असून, त्यात राहुल बजाज यांचे भरीव योगदान होते. त्यांनी बजाज उद्योग समुहाची पुण्यात उभारणी करुन अनेक लघुउद्योजकांना वाव दिला आणि असंख्य कामगारांना रोजगार देऊन त्यांचे आयुष्य घडवले. जमनालालजी बजाज हे महात्मा गांधींचे सहकारी होते. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन बजाज परिवार देशसेवेत सदैव कार्यरत राहिला आहे.
– मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, कॉंग्रेस

पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील बजाज ऑटोमधील मागणीवर अनेक उद्योग तरले. बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी मिळणाऱ्या ऑर्डर्समुळे अनेक लघु, मध्यम व सूक्षम उद्योग निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उद्योग समूहाचा दबदबा निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मातीशी नाळ तुटू दिली नाही. आकुर्डीतील त्यांचे वास्तव्य हे तमाम पिंपरी-चिंचवडकरांना अभिमानाची बाब होती. कामगारांची काळजी, महिला कामगारांचा सन्मान आणि समाजाप्रति असलेला आदर त्यांनी काय ठेवला. त्यांच्या या असामान्य कार्यामुळे त्यांची स्मृती कायम उद्योजक व कामगारांच्या ह्दयात तेवत राहिन.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना

‘ऑटो हब’ म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीच्या भरभराटीमध्ये बजाज आणि टाटा मोटर्स या दोन्ही उद्योग समूहांचा सिंहाचा वाटा आहे. बजाज उद्योग समूहाने बाजारात आणलेल्या स्वदेशी बनावटीच्या दुचाकी वाहनांना विशिष्ट दर्जा मिळाला. हा दुचाकी उत्पादनाच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. सर्वच स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या स्वदेशी दुचाकी बनविणाऱ्या बजाज समूहाने जगातील अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादने पोहचविली आहेत. हमारा बजाज ते पल्सर अशी त्यांची झेप माझ्यासारख्या उद्योजकांना स्फुर्तीदायक आहे. त्यांच्या दुचाकी, तीनचाकी निर्मितीच्या निर्णयाने उद्योग क्षेत्रात क्रांती घडली आहे.
– विजय देशमुख, संचालक, इंजिनिअरिंग क्‍लस्टर

राहूल बजाज यांचे साधु वासवानी मिशनशी आपुलकीचे नाते होते. त्यांच्याबद्दल दादा वासवानी म्हणाले होते, की ‘राहूल बजाज हे विश्‍वासू आणि धैर्यशील व्यक्तिमत्व आहेत.’ आपल्या जीवनाचा हेतू सर्वांना मदत करणे हा आहे, हे सत्य त्यांना उमगले होते. राहूल बजाज हे जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघणारी व्यक्ती होती म्हणून ते सर्वाकडे प्रेमाच्या प्रगल्भ दृष्टीने बघत. ते आयुष्य भर बंधुभाव जपणारे आणि शांतीप्रिय माणूस होते.
– साधू वासवानी मिशन

राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय वाहन उद्योगाला नवा आयाम देणारा द्रष्टा उद्योगपती हरपला. उद्योग क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणारे आणि दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून बजाज यांची ओळख होती. उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांच्याकडे कमालीचे सामाजिक भान होते. आदर्श उद्योजक आणि समाजसेवक गमावल्याची भावना आहे.
– राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज

राहुल बजाज यांचे जाणे आपल्या सर्वांसाठीच वेदनादायी आहे. ते केवळ पुण्याचेच नाही, तर देशाचे भूषण होते. उद्योग क्षेत्रातील उत्तम नेतृत्व, मार्गदर्शक आणि पितामह हरवला आहे. भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय होते. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच मी अधिक प्रभावित झाले होते.
– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

राहुल बजाज यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. माझे वडील पी. पी. छाब्रिया यांचे ते खास मित्र होते. त्यांची ही मैत्री आमच्या तीन पिढ्यांशी आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझे व्यक्तिगत किंवा उद्योग जगताचेच नाही, तर राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. आयुष्यभरात त्यांनी केलेल्या कार्याची यादी मोठी आहे. दूरदर्शी आणि कल्पनारम्य अशा रिक्षाची निर्मिती करून सामान्य माणसाला सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांचे योगदान प्रेरक आहे. त्यांचा हा वारसा राजीव आणि संजीव दोघेही पुढे घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे.
– प्रकाश पी. छाब्रिया, चेअरमन, फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...