सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे आचरणात आणावे लागेल

Date:

पुणे- सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल तरच माणूस माणसाला जोडला जाईल आणि त्यातून देश जोडला जाईल असे मत विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले.

अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स (इंडिया) प्रा. लि. ,पुणे यांच्या वतीने सन्मान गुणवत्तेचा… गौरव जीवनाचा..या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जेष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष यशोवर्धन बारामतीकर, टेलेकॉम सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. जनरल डॉ. एस. पी. कोचर, एआयसीटीईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे सिनिअर प्रोग्रामअॅडवायजर सचिन इटकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. शंकर देओस्कर, हिरवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, पुणे मॅनजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तुपे, व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्रचे मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, ग्रीन थंबचे सल्लागार आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे, डॉ. दयानंद सोनसालेआदी यावेळी उपस्थित होते. डॉ. गजानन एकबोटे यांना शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर जीवन गौरव पुरस्कार, डॉ. जयंत अभ्यंकर (शारंगधर ग्रुप) यांना आरोग्य क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर हॉल ऑफ फेम पुरस्कार, श्री विनायक निम्हण (सनी वर्ल्ड) यांना हॉटेल व रिसोर्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग ब्रँड पुरस्कार, गीतराम कदम यांना अन्न प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायरब्रँड टू वॉच २०१९, शेखर मुंदडा यांना स्वयंसेवी संस्था क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर एनजीओ पुरस्कार, डॉ. सुभाष मारलेवार यांना होलेष्टीक औषध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर सर्व्हिस टू सोसायटी पुरस्कार, पांडुरंग शेलार यांना पाणी व्यवस्थापन क्षेत्रातउ ल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि संतोष राऊत यांना सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनिष भांदवे, अविनाश तरवडे, अतुल निकम यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

दादा इदाते म्हणाले, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे अशी प्रतिज्ञा रोज म्हटली जाते. परंतु आपल्याला खरोखर भारत व त्यातील लोक यांची माहिती असते का? कारण देश आणि लोक यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल त्यातूनच माणूस आणि देश जोडला जाईल असे ते म्हणाले.  विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावात फक्त चौथी पर्यंत शाळा होती. मात्र, बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली. त्या गावात काम सुरु केले. आज त्याठिकाणी मॉडर्न कॉलेज आहे. देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी अनेकांचे योगदान असते. त्यांचे कार्य समाजासमोर येणे महत्वाचे असते. त्यासाठी त्यांचा सन्मान होणे उचित ठरते असे त्यांनी नमूद केले.

मनोज जोशी म्हणाले, गावाकडून येऊन तळागाळातल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम संजय गांधी अॅस्पायर नॉलेज अँड स्किलच्या माध्यमातून करत आहेत. जे जीवनात यशस्वी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी अॅस्पायर झटत आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.

डॉ. एकबोटे म्हणाले, मी पेशाने डॉक्टर असलो तरी अपघाताने गुरूंच्या सांगण्यावरून शिक्षण क्षेत्रात आलो. आपल्या हातून चांगली पिढी घडविण्याचे पुण्य मिळेल या हेतूने शैक्षणिक संस्था सुरु केली. आज संस्थेच्या ६८ शाखा आणि ५५ हजार  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देणे हा हेतू ठेवून आजपर्यंत वाटचाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

विनायक निम्हण म्हणाले, गेली ३०-३५ वर्षे राजकारण, समाजकारण करतो आहे. त्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले परंतु व्यवसायामधला हा पहिला पुरस्कार आहे. तो मला सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. राजकारण, समाजकारण किंवा व्यवसाय असे कोणतेही काम मनापासून केले तर ते सोपे होते आणि त्यात यश नक्की मिळते असे त्यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. जयंत अभ्यंकर, गीतराम कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये संजय गांधी यांनी  अॅस्पायर नॉलेज अँड स्किल संस्था करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तरुणांना त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच सर्वांना एकत्र करून एक नवा भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने अॅस्पायर काम करीत आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समिधा गांधी आणि समिरा गुजर यांनी केले तर आभार हुसेन हाजिते यांनी मानले. त्यानंतर अभिनेते मनोज जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले ‘चाणक्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.