जायका प्रकल्प – नदी सुधार योजना , चार वर्ष गेली , आता तरी कार्यवाही करा;मोहन जोशींचे आवाहन

Date:

पुणे- शहराची जीवनवाहिनी असणार्‍या मुळा-मुठा नदीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार्‍या जायका प्रकल्पासंदर्भात सुमारे 990 कोटी रूपयांचे कर्ज मिळूनही गेल्या चार वर्षात कोणतीच कार्यवाही झाली नाही. केंद्रात, राज्यात व पुणे महानगरपालिकेत भाजपचे सरकार असूनही गेल्या चार वर्षात या सुमारे 990 कोटी रूपयांच्या प्रकल्पापैकी अवघी 35 कोटी 14 लाख रूपये खर्च झाले असून केवळ सल्लागार नेमणे या पलिकडे काम पुढे सरकले नाही. चार वर्षात पर्यावरण विषय परवानगी मिळू शकली नाही. ही पुणेकरांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे. पुण्याचे श्री प्रकाश जावडेकर हे केंद्रात मंत्री असून श्री गिरीष बापट हे देखील आता खासदार बनले आहेत. तसेच पुण्यात सर्व आमदार भाजपचे आहेत. पुण्याला वरदान ठरणार्‍या या महत्वाकांक्षी प्रकल्पास पर्यावरणाची परवानगी मिळून या प्रकल्पाची सुरूवात कधी होईल व हा प्रकल्प कधी पूर्ण होईल हे त्यांनी 5 जून पर्यावरण दिनानिमित्त पुणेकरांना सांगावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केले आहे. आता केंद्रिय पर्यावरण खाते पुन्हा श्री. प्रकाश जावडेकरांकडे आले असल्याने पुण्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या या प्रकल्पाला ते व्यक्तिगत लक्ष घालून गती देतील अशी अपेक्षा पुणेकरांची आहे असे मोहन जोशी म्हणाले.

मोहन जोशी म्हणाले की, केंद्र सरकार व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी म्हणजे 13 जानेवारी 2016 रोजी करार झाला. त्यानुसार जायकातर्फे सुमारे 990 कोटी रूपयांचे कर्ज अवघ्या 0.30 टक्के व्याजदराने देण्यात आले. मात्र चार वर्ष झाली तरी पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या या नदी सुधार योजनेचे काम ठप्प झाले आहे. पर्यावरण विषयक परवानग्या देण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला सूचना केल्या. या संदर्भात सादरीकरण फक्त झाले. या प्रकल्पाला पर्यावरणविषयक परवानग्या देण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही असे सांगितले गेेले. त्यामुळे केंद्र व राज्यातील सुसंवादाच्या अभावी या प्रकल्पास पर्यावरण विषयक हिरवा कंदिल दाखवला जात नाही ही निश्चितच खेदाची बाब आहे असे ते म्हणाले.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, 35 कोटी 14 लाख रुपये फक्त प्रशासकीय कामांसाठी खर्च झाले आहेत. प्रत्यक्ष काम काहीच नाही. पुण्यातील मुळा-मुठा नद्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याची जबाबदारी आता भाजपने पार पाडली पाहिजे. आधीच पुण्याच्या पर्यावरणाचा प्रश्न बिकट झाला आहे. नद्यांमध्ये प्रदुषित पाणी जात असल्याने पुण्याची जैवविविधता धोक्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्ण होणे ही पुण्याची गरज आहे.

यासंदर्भात मोहन जोशी पुढे म्हणाले की,  या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी 11 पैकी सहाच जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्याबाबतही अधिक विलंब न लावता उर्वरीत जागा ताब्यात घेऊन भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासंदर्भातही प्रयत्न व्हायला हवेत. पुण्याच्या नदीच्या विकासासाठी योजना झाली, निधीही आला. मात्र चार वर्ष कार्यवाही नाही ही बाब कोणत्याच पुणेकराला रूचणार नाही त्यामुळे आतातरी पर्यावरण दिनाच्यानिमित्ताने केंद्रिय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर व नवनिर्वाचित खासदार श्री गिरीष बापट तसेच पुण्यात निवडून आलेल्या भाजपच्या सर्वच्या सर्व आमदारांनी याबाबत ठोस कृती कार्यक्रम जाहीर करावा. अशी अपेक्षा पुणेकरांची आहे असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...