रात्रीस खेळ चाले… (सीरिअल VS  क्रिकेट) : लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

Date:

“१०.३० वाजायला आलेत, आता ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू होईल”, सासूबाई उठून रिमोट घेणार इतक्यात…”आजी ‘रात्रीस खेळ चाले’ कुठे पाहते आता, हा बघ इथे रात्रीचा खेळ रंगात आला आहे” ओमकार झटकन म्हणाला. वानखडेवर चालू असलेला ‘मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब’ हा आयपीएलचा क्रिकेटचा सामना जबरदस्त रंगात आला होता. प्रत्येक बॉलला छातीचे ठोके वाढत होते. १० षटकांत मुंबईला फक्त ६५ धावांपर्यंत मजल मारता आली होती. पोलार्डने मात्र फलंदाजीची एक बाजू भक्कम सांभाळत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चालवला होता आणि अशा वेळी मॅच मधेच बघायची थांबून सीरिअल लावणे काही शक्य नव्हते. सासूबाईंच्या हे लक्षात आल्यावर त्याही निमूटपणे मॅच बघत बसल्या. मॅच ऐन रंगात आली होती. पोलार्डने हाणलेल्या प्रत्येक चौकार-षटकाराला घरातही मोठ्याने आरोळ्या मारत मॅचवरचे निस्सीम प्रेम व्यक्त केले जात होते. पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबई नक्क्की जिंकणार, असे वाटू लागले असतानाच मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला. पुन्हा आता काय होणार, कोण सरशी साधणार याची मनात धाकधुक सुरू झाली. शेवटच्या षटकात ही उत्कंठा तर टिपेला पोहोचली…कोण जिंकतंय, मुंबई की पंजाब?? आता पंजाब जिंकतोय असं वाटत असतानाच शेवटच्या बॉलला मॅच फिरली आणि मुंबई जिंकली. रात्रीचा हा खेळही रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झाला. आयपीएल सुरू होण्याआधी मार्चमध्येच ओमकारने आजीला साळसूदपणे सांगितले होते,  “आजी आता तुझा सीरिअलचा प्राईम टाइम चुकणार. आता आयपीएल आणि नंतर वर्ल्ड कप म्हणजे आमचा प्राईम टाइम चालू होणार.

गार्डनमध्ये संध्याकाळी राऊंड मारताना सुद्धा याचा प्रत्यय आला. नेहमी मुलांचा गोंगाट चालू असतो त्या मैदानात सामसूम होती. गार्डनमध्ये महिला मंडळाचा ग्रुप ७. ३० वाजले तरी गप्पा मारत होता. साधारणपणे ५ ते ६.३०-७  या वेळेत असणारा हा ग्रुप आता  गेल्या  काही दिवसांपासून उशिरापर्यंत चक्क गार्डनमध्ये कसा? आश्चर्य वाटले म्हणून ग्रुपमधीलच ओळखिच्या मावशींकडे चौकशी केली. “आता रोजच मॅच चालू असते गं, टीव्हीवर सीरिअल वगैरे काही बघायला मिळत नाही; मग आम्ही रिपीट टेलिकास्ट बघून उशिरा संध्याकाळी इकडे येतो”… मावशींनी आयपीएलच्या नावाने बोटे मोडली.

संध्याकाळी ६.३०. ते रात्री ११ हा सीरिअलचा, विशेषतः गृहिणींचा प्राईम टाइम. रात्रीच्या जेवणाची तयारी लगोलग करून रिमोटचा कंट्रोल आपल्याकडे घेऊन सीरिअलचा आस्वाद घ्यायचा हे प्रातिनिधिक चित्र, परंतु त्याच वेळेला मॅच चालू झाली की मात्र त्रागा. घरातल्या घरात द्वंद्वयुद्ध – सीरिअल विरुद्ध मॅच! सीरिअल रेकॉर्ड करून मागाहून बघता येते हो पण मॅचचं तसं नाही ना…ती लाईव्ह बघण्यातच खरी मजा. त्यामुळे आता आयपीएल ते थेट वर्ल्ड कपपर्यंत तरी हा माहोल धुमसत राहणार बहुदा.

वानखडेला पंजाबवर रोमांचक क्षणी मात करून मुंबईने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. मॅच संपली की  रात्री उशिरा सीरियल. काही झालं तरी ‘रात्रीस खेळ चाले’चे एपिसोड रात्रीच बघण्यात मजा. क्रिकेटमध्ये मिनिटागणिक जशी वाढत जाते अगदी तशीच उत्कंठा …आज सरिता कशी वागणार आणि वच्छीची सून- शोभा, सरिताला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्या नवीन क्लुप्त्या शोधणार…दोन्हीही रात्रीचे हे खेळ रंगात आणणारे!

लेखिका -पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ, दहिसर (प.), मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.