पुर आला तिथे दुरुस्ती- पिण्याच्या पाण्याचे होतेय वांधे…

Date:

पुणे : पावसामुळे महापालिकेच्या पद्मावती जलकेंद्रात पाणी शिरले असून, त्यामुळे या केंद्रातील आठ पंप जळाले आहेत. तसेच, दांडेकर पूल, कात्रज (राजीव गांध प्राणिसंग्रहालय) सिंहगड रस्ता (सनसिटी) आणि येवलेवाडीतील नाल्यांवरून टाकलेल्या जलवाहिन्याही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे पद्मावती जलकेंद्रातर्गंत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, त्याच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. तसेच, वाहून गेलेल्या जलवाहिन्यांची कामे होती घेतली असली तरी त्यातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (27 सप्टेंबर) सकाळी बंद राहणार आहे.कात्रज आणि येवलेवाडीतील कामे शुक्रवारी (27 सप्टेंबर) दुपारपर्यंत पूर्ण होतील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. तर, विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी कात्रज, येवलेवाडी, दांडेकर पूल आणि सनसिटी येथील ओढ्या-नाल्यांवरून वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे नाल्यांत पाणी पाणी आल्याने त्या वाहून गेल्या. तर पद्मावती जलकेंद्रात प्रचंड पाणी साचल्याने तेथील आठ पंप जळाले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलकेंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

या भागांतील पाणीपुरवठा बंद (पद्मावती जलकेंद्र) : बिबवेवाडी टाकी : बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, गंगधाम, बिबवेवाडी गावठाण, माकर्केटयार्ड, गुलकटेकडी, इंदिरानगर झोपडपट्‌टी, डायस प्लॉट, महर्षीनगर अंशत:, न्यू इरा सोसायटी, बुराणी कॉलनी, पीएमपी कॉलनी, संदेशनगर, विद्यासागर कॉलनी, सोपान महाराज, बिबवेवाडी कोठारी ब्लॉक, बिबवेवाडी ओटा, लोअर इंदिरानगर, वसंतबाग, पारिजात, अतनिकेत सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, आंबेडकरनगर परिसर.
तळजाई गोल : पद्मावती परिसर, संभाजीनगर, चव्हाणनगर, तळजाई वसाहत, अहिल्यादेशी चौक, के के. मार्केट, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, अप्पर-सुपर, लेक टाऊन, बालाजीनगर, गुलाबनगर परिसर, इत्यादी.
सेमिनरी टाकी : वर्धमानपुरा, स्वयंभू सोसायटी, पापळवस्ती,पोकळेवस्ती, शिवतेजनगर, महेश सोसायटी, मिठानगर, शिवनेरीनगर, अप्पर-सुपर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर,भाग्योदयगर,
दांडेकर पूल वाहिन्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : शास्त्री रस्ता परिसर, लोकमान्य कॉलनी, नवी पेठ परिसर, लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज), पूना हॉस्पिटल, राजेंद्र नगर, वैकुंठ, डेक्कन, पुलाची वाडी,प्रभात रस्त्यावरील सर्व गल्ली,

टँकरने होणार पाणीपुरवठा
दरम्यान, पद्मावती जलकेंद्राच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याने या केंद्रातून पुरवठा होणाऱ्या भागांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जलकेंद्रातून टॅंकर सोडण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, लोकांना पाणी कमी पडू देणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...