पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेमुळे भारतात लोकशाही मजबूत राहिली आहे . असे मत आज विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी संविधा यात्रेला संबोधित करताना व्यक्त केले .
पुण्यातील समता भूमी , महात्मा फुले वाडा येथून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि मशाल प्रज्वलित करून येथून या यात्रेचा प्रारंभ झाला .भाजपचे खासदार अनिल शिरोळे , कॉंग्रेस चे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड ,तसेच रिपब्लिकन चे महेंद्र कांबळे,राहुल डंबाळे आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते येथे उपस्थित होते . . खासदार शिरोळे यांनी यात्रेत आपला सहभाग शेवटपर्यंत नोंदविला. मात्र भाजपचे अन्य नेते कुठे दिसले नाहीत . नगरसेवक अविनाश बागवे , सदानंद शेट्टी,परशुराम वाडेकर , तसेच अनिल सातपुते ,सतीश पवार , नितीन हंबीर आदी मान्यवर कार्यकर्ते आणि असंख्य भिमप्रेमी तरुण या यात्रेत साभागी झाले होते .जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला .
बाबासाहेबांच्या घटनेमुळे लोकशाही मजबूत -संविधान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)
Date: