वारकरी संप्रदाय व शीख धर्म यांच्यात डॉ. अशोक कामत यांनी सेतू बांधला – डॉ. सदानंद मोरे

Date:

पुणे-संत नामदेवांनी महाराष्ट्रातील संतांचे विचार सिंधू नदीपर्यंत नेले. त्यानंतर उत्तर भारतातील सर्व संतांचे विचार महाराष्ट्रात पोचविण्याचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले. शीख आणि वारकरी संप्रदाय यांच्यात सेतू तयार करण्याचे काम त्यांनी केले ही फार महत्त्वाची बाब आहे. प्राचीन ऋषींप्रमाणेच निरपेक्ष वृत्तीने आयुष्यभर ज्ञानदानाचे काम करणारे डॉ. अशोक कामत हे खर्‍या अर्थाने महर्षी आहेत असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आज काढले. 27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांचा गौरव करताना डॉ. सदानंद मोरे पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. बडोदा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते.पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी ‘महर्षी’ पुरस्कार दिला जातो. समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. यंदा त्यासाठी डॉ. कामत यांची निवड करण्यात आली. देवीची मूर्ती असणारे स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सौ. जाई कामत यांचा साडी, गजरा व श्रीफळ देऊन सौ. जयश्री बागुल यांनी सत्कार केला.

प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक आबा बागुल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महर्षी पुरस्काराने सन्मानित डॉ. अशोक कामत हे केवळ पुण्याचेच नव्हे, तर सार्‍या महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्या व्यासंगामुळे ज्ञानाचा फार मोठा ठेवा पुढील पिढ्यांना मिळाला आहे.

पुरस्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. अशोक कामत यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही शतकातील महर्षींचा उल्लेख करून म्हटले की, ‘महर्षी दयानंद सरस्वती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारखे महर्षी यांचे आयुष्य हीच माझी प्रेरणा आहे. त्यानंतर ही परंपरा लोकमान्य टिळक, दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, पं. अमरेंद्र गाडगीळ यांच्यासारख्यांनी पुढे चालवलेली दिसते. कारण महान माणसे तयार करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत व संस्कृतीत आहे’, असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, शिखांचे दहा धर्मगुरू आणि ग्रंथसाहिबा यांचा अभ्यासपूर्ण परिचय मराठी भाषकांना करून देण्याचे मोलाचे काम डॉ. अशोक कामत यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी अन्य संतांनी सांगितलेली सेवा, भक्ती, समता याची शिकवण मराठी माणसांना दिली.

या कार्यक्रमात मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आणि राजू बागुल यांनी केले. करोना परिस्थितीनंतरच्या निर्बंधांच्या अधीन राहून सर्व कार्यक्रम संपन्न झाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...