पुणे-कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘EVM हटाव लोकशाही बचाव’ या मागणीसाठी आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष तथा खासदार वंदना चव्हाण व अखिल भारतीय कॉंग्रेस पुणे शहर कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश
बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व इतर प्रादेशिक निवडणूकींमध्ये EVM मशीनमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्येफेरफार होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. तसेच एकंदर मतदान प्रक्रियेमध्ये बरीच अनियमितता आढळून येत आहे. या EVM मशीनच्या सदोष प्रणालीमुळे लोक रस्त्यावर उतरून उपोषण आणि मोर्चे काढत आहे तर दुसरया बाजूला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहे आणि म्हणूनच सामान्य मतदारांच्या हक्कासाठी कॉंग्रेस व
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व इतर प्रादेशिक निवडणूकींमध्ये EVM मशीनमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्येफेरफार होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. तसेच एकंदर मतदान प्रक्रियेमध्ये बरीच अनियमितता आढळून येत आहे. या EVM मशीनच्या सदोष प्रणालीमुळे लोक रस्त्यावर उतरून उपोषण आणि मोर्चे काढत आहे तर दुसरया बाजूला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहे आणि म्हणूनच सामान्य मतदारांच्या हक्कासाठी कॉंग्रेस व
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर ,अंकुश काकडे , दीपक मानकर ,मोहन जोशी, कमल व्यवहारे, , अरविंद शिंदे, चेतन तुपे, रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, अविनाश बागवे, बाबुराव चांदेरे,योगेश ससाणे, दीप्ती चौधरी,बाळासाहेब अमराळे,रुपाली चाकणकर आणि अनेक काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्नाटकसह अनेक निवडणुकांमध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशिनचा फेरविचार व्हायला हवा. अनेक मोठ्या देशांमध्येही बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. त्यामुळे आपल्याकडेही सर्व निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहराध्यक्ष तथा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील मतदानाच्या अकड्यांची तफावत समोर मांडत भाजप सरकारच्या भेसळ कारभाराची पोलखोल केली. आपल्या भाषणात त्या बोलताना म्हटल्या, “ परिपक्व निवडणूक म्हणजे, अचूक
प्रक्रिया राबवत मतदारामध्ये विश्वास करणे होय आणि त्यासाठीची संपुर्ण जबाबदारी ही सत्ताधार्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या परिच्छेद क्र.२९ नुसार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी EVM
मशीन VVPAT प्रणालीला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निपक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तसेच परिच्छेद क्र. ३१ नुसार VVPAT प्रणालीसाठी सरकारने आवश्यक आर्थिक निधी दिला पाहिजे असे असताना देखील याबाबत शिताफीने दुर्लक्ष हे सत्ताधारी करत” असल्याची टिका यावेळी चव्हाणांनी केली. पुढे
बोलताना त्या म्हणाल्या, “ सत्ताधारी भाजप पक्षाचे डॉ.सुब्रामन्याम स्वामी यांनी सुद्धा EVM मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
राज्यसभेत अल्प कालावधीसाठी चालू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुधारणा संबधित चर्चे दरम्यान मी देखील EVM मशीनसंदर्भातआणि निवडणूक प्रक्रियेविषयक अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील त्रुटींकडे देखील लक्ष वेधले होते.
प्रक्रिया राबवत मतदारामध्ये विश्वास करणे होय आणि त्यासाठीची संपुर्ण जबाबदारी ही सत्ताधार्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या परिच्छेद क्र.२९ नुसार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी EVM
मशीन VVPAT प्रणालीला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निपक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तसेच परिच्छेद क्र. ३१ नुसार VVPAT प्रणालीसाठी सरकारने आवश्यक आर्थिक निधी दिला पाहिजे असे असताना देखील याबाबत शिताफीने दुर्लक्ष हे सत्ताधारी करत” असल्याची टिका यावेळी चव्हाणांनी केली. पुढे
बोलताना त्या म्हणाल्या, “ सत्ताधारी भाजप पक्षाचे डॉ.सुब्रामन्याम स्वामी यांनी सुद्धा EVM मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
राज्यसभेत अल्प कालावधीसाठी चालू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुधारणा संबधित चर्चे दरम्यान मी देखील EVM मशीनसंदर्भातआणि निवडणूक प्रक्रियेविषयक अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील त्रुटींकडे देखील लक्ष वेधले होते.

