ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” पुस्तकाचे प्रकाशन

Date:

मुंबई, दि. 2 : जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो तो खऱ्या अर्थाने लेखक असतो. आपल्या मनात आलेले विचार सहजपणे सुचणे आणि लिहिणे यासारखा सुंदर उपक्रम असू शकत नाही. कारण याच लेखनाच्या माध्यमातून आपण सहजपणे अनेक पिढयांशी जोडले जातो असे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” या अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या, ऋतूरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झाले.या पुस्तक प्रकाशन सोहळयास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार दिपक केसरकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार किशोर जोरगे, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मंजुळे म्हणाले की, फॅण्ड्री केल्यानंतर अनेक लोकांचा संपर्क येऊ लागला. गडाख कुटुंबियांशी माझी त्यानंतर ओळख झाली. यशवंतराव गडाख यांना मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून ओळखत असून प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर मला त्यांच्याबद्यल वेगळा जिव्हाळा वाटतो. आज त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळयासाठी मला निमंत्रित करण्यात आले आहे हा माझा सन्मान वाटतो.
समाजात राहताना संवेदनशील असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून यशवंतराव स्वत: बोलल्याचा भास होतो.

अनेकदा त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी करणे गरजेचे असते, त्यामुळे काहीतरी सुचले तर ते लिहून काढणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत असताना अभ्यासावरुन वडिलांकडून खूप मार खाल्ला पण आज वडिल नसल्यावर वडिलांची माया कळून येते.दहावीत नापास झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावरही आपले वडिल आपल्या मागे किती भक्कमपणे उभे होते हे सांगताना श्री. मंजुळे हळवे झाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, मनात सतत वाईट भावना असतील तर मनात चांगले विचार येऊन ते मांडणे कठीणच असते. पण यशवंतराव गडाख यांनी राजकारणात असूनही समाजकारण करीत सोनई गावाचे सोने केले. राजकारणात असूनही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले. 1970 मध्ये अहमदनगरमध्ये साहित्य संमेलन भरवून त्यांनी आपले साहित्यावर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यावेळी म्हणाले की, लेखक आणि पत्रकार हे अनोळखी वाचकांच्या प्रेमावर जगत असतात. माझी आणि यशवंतराव यांची रोज भेट होत नसली तरी आमची चांगली मैत्री आहे. माझ्या मते रोजगार हमी योजनेचे कामगार आणि लेखक यामध्ये फारसा फरक नाही कारण रोजगार हमी योजनेचे कामगार दररोज दगड फोडतात तर लेखक हे दररोज शब्द फोडत असतात, भाषेशी खेळत असतात. आपल्या लेखनाशी संवेदना आणि प्रामाणिकता असेल तर सोनई असो किंवा सॅन फ्रॅन्सिस्को लेखनातला आनंद मिळतच राहतो.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी म्हणाले की, मनातला पाऊस हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. राजकारण करीत असताना समाजकारण कसे करता येते, आपल्या अवती भवती आपल्यासाठी काम करणारे, आपल्या परिचयातले किती महत्वाचे असतात हे त्यांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये मांडले आहे. आजच्या काळात आपल्याला सूचत असलेल्या गोष्टी लिहून ठेवणे आवश्यक आहे.

एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, सालसपणा, सुस्वभावीपणा आणि संस्कृतपणा यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव गडाख यांनी नेहमीच जपला. यशवंतराव गडाख यांचे लिखाण हे ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या लेखनातून प्रत्येक गावाचे काय वेगळे वैशिष्टय असू शकते हे उत्तमपणे मांडले आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे गावाचे अस्तित्व कमी होत असताना मनातला पाऊस हे मनाला आनंद देणारे पुस्तक आहे.

या पुस्तकाविषयी बोलताना अरुण शेवते म्हणाले की, यशवंतराव गडाख आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. 1993 साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि आज इतक्या वर्षांनी त्यांची अनेक पुस्तके संपादित केल्यानंतर मनातला पाऊस हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

यापूर्वी यशवंतराव गडाख यांचे अर्धविराम आत्मचरित्र, अंर्तवेध, सहवास, माझे संचित ही पुस्तके प्रकाशित झाली असून अर्धविराम हे आत्मचरित्र, पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत.यशवंतराव गडाख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ऋतूरंग मधल्या निवडक लेखांचे हे पुस्तक असूनया पुस्तकाचे संपादन करणाऱ्या अरुण शेवते यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...