कुणबी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी प्रदान

Date:

मुंबई, दि. 22 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. 20) एका विशेष समारंभात सुपुर्द् करण्यात आला. कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी राज्य सरकार बांधील आहे. कुणबी, ओबीसी समाजबांधवांसह विविध समाजघटकांसाठी कार्यरत विकास महामंडळांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून त्यानुसार निधी उपलब्ध केला जात आहे. नवीन घटकांना आरक्षण देत असताना सध्या लागू मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील कुणबी समाजबांधवांच्या मुलांना मुंबईत शिक्षण घेत असताना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची व त्यासाठी पाच कोटींचा निधी राखून ठेवल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाला मुलुंड येथे कुणबी विद्यार्थी वसतीगृह बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी देण्याचा शासन निर्णय जुलैमध्येच तातडीने जारी करण्यात आला. त्या पाच कोटींच्या निधीचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सह्याद्री अतिथीगृहात विशेष समारंभात सुपुर्द करण्यात आला. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, संदिप रायपूरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदींसह संघाचे पदाधिकारी, सभासद व कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे चालत राहण्याची आपली परपंरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय शरद पवार साहेबांपासून उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत राज्याच्या प्रत्येक प्रमुखाने ही परंपरा जपली आहे. विकासाची ही परंपरा यापुढेही कायम राहील. एका समाजाला मदत करताना, त्यांचे हक्क देतांना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल. मुलुंड येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून उभं राहत असलेलं वसतीगृह हे आधुनिक, आकर्षक, सर्व सुविधायुक्त असावं. त्यांचं बांधकाम दर्जेदार व इमारतीत सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवावी. इमारत पर्यावरणपुरक व शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांकेडे व्यक्त केली. इमारतीच्या उभारणीत काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं.

खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले की, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतीगृह असले पाहिजे, असा विषय उपमुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केल्यानंतर त्यांनी मागणीची सकारात्मक दखल घेतली व अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. यासंदर्भातला शासननिर्णयही तातडीने जारी करण्यात आला. त्या पाच कोटींच्या धनादेशाचे वितरण आज होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वेगवान कार्यपद्धतीमुळेच हे काम तातडीने मार्गी लागत आहे, असे गौरवोद्गारही खासदार सुनील तटकरे यांनी काढले. मुंबईतील या वसतीगृहाच्या माध्यमातून कुणबी विद्यार्थ्यांना मुंबईत राहण्यांसाठी हक्काची सोय उपलब्ध होणार आहे. वसतीगृहाचा उपयोग करुन समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतील, जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विविध जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या शाखांचे उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षांची तयारीसाठी समाजोन्नती संघ व शासनातर्फे आर्थिक मदत केली जात असल्याची माहिती यावेळी सघांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली तसेच वसतीगृहाच्या उभारणीसाठी तत्परतेने मदत केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...