पुणे -समाविष्ठ गावांसाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात किमान २००० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी आज महापौर , उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्या यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली .

गणेश ढोरे यासंदर्भात असे म्हटले आहे कि,’महानगरपालिकेत सन २०१७ साली ११ गावे समाविष्ठ केली गेली त्यावेळी महाराष्ट्र राज्यात व पुणे महानगरपालिकेत सुद्धा आपले भाजपा सरकार होते. त्यावेळी आपण या ग्रामीण भाग असलेल्या ११ गावांच्या विकासासाठी किती निधी राज्य शासनाकडे मागितला होता..? तो का मिळाला नाही..?
आता नव्याने २३ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झाली, यासाठी आपण तब्बल ९००० कोटी रुपयांची मागणी राज्यशासनाकडे केलेली आहे. या आपल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु २०१७ साली समाविष्ठ ११ गावांसाठी आपणा आपले पक्षाच्या राज्यशासनाकडे कोणत्याही प्रकारची पुरेशी तरतूद मागितली नाही, याची ११ गावांचा लोकप्रतिनिधी म्हणून खंत वाटते. या २३ गावांच्या तुलनेने ११ गावे लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असून या गावांच्या विकासासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद सुद्धा कमी पडणार आहे. आपल्या मनपा प्रशासन व सत्ताधारी यांनी ग्रामीण पार्श्वभूमीच्या ११ गावांसाठी चालूवर्षी किमान २००० कोटी रुपयांची भरीव अर्थिक तरतूद देणे अपेक्षित आहे.
पुढे गणेश ढोरे यांनी असेही म्हटले आहे कि,’ कोविड -१९ ची पार्श्वभूमी लक्षात घेता, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कपात केली गेली यामुळे या ११ गावांतील विकाससकामांच्या बाबतीत नागरिकांचा अपेक्षांचा भंग झालेला आहे. नागरिकांच्यामागणीनुसार व गरजेनुसार चालू वर्षी किमान २००० कोटी रुपयांची तरी आर्थिक तरतूद महानगरपालिकेने या ११ गावांच्या विकासासाठी देणे आवश्यक आहे.तरी, सन २०२१-२२ महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ११ गावांसाठी चालू वर्षी किमान २००० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद स्थायी समिती अध्यक्ष यांनी करावी व ही तरतूद मिळवून द्यावी

