भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांतता अशक्य : प्रकाश आंबेडकर

Date:

मुंबई-कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी अकरा वाजता भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आरोपींच्या अटकेशिवाय शांतता शक्य नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.आणि हि विनंती त्वरित मुख्यमंत्री यांनी मान्य केली आहे .

आंबेडकर म्हणाले, बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी या यादीतील लोकांना आम्ही हजर करु मात्र, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही, असे ते म्हणाले.

या बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात येईल तसेच आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. भिडे आणि एकबोटे यांना अटक होते की नाही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...