पुणे :
’सॅट अॅट बी व्ही‘ चर्चासत्राचा चे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. बीपीएल ग्रुप चे ‘एक्स रे’ सल्लागार (बंगळूर) अनिल जठार यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अनिल जठार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘यशस्वी माणूस होण्यासाठी आपली ताकद आणि कमकुवतता जाणून घेण्यासाठी स्वत: शी बोला. आपण करीत असलेले कार्य एकनिष्ठेच्या धोरणा नुसार आहे की नाही याबाबत प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्वातील दोष ओळखण्यासाठी आणि सकारात्मकता येण्यासाठी स्वतःशी बोलने उत्तम. याचा अर्थ स्वतःची प्रशंसा करणे नसून, यामुळे आत्मपरीक्षण केले जाऊन कमकुवतपणा सुधारला जाऊ शकतो.
उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ.भालेराव म्हणाले, ‘या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. विद्यार्थ्यांचा थेट उद्योजकांशी संवाद साधण्याच्या प्रमुख हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना नवोदित अभियंते म्हणून काम करताना तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमास विद्यर्थ्यांकडून आणि उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
यशस्वी उद्योजकांची कौशल्ये, त्यांचा यशाचा प्रवास याबद्दल प्रत्यक्ष विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. भारतीय आणि पाश्च्यात्य व्यवस्थापकीय धोरणे विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात.

