मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्नांची गरज

Date:

पुणे :’ उच्च शिक्षणात मुस्लीमांचे अल्प प्रमाण हा सर्वांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे.मागास मुस्लिमांच्या प्रगतीसाठी अधिक संशोधन आणि सर्व स्तरीय निरंतर प्रयत्नांची गरज आहे ‘ असे मत संशोधकांनी व्यक्त केले.
विकासान्वेष फाऊंडेशन ‘ आयोजित ‘ रुरल इंडिया ‘ राष्ट्रीय परिषदेच्या चर्चेत हा  सूरउमटला.
 ‘ भारतातील उच्च शिक्षणात मुस्लीम समाजाचे अल्प प्रमाण ‘ या विषयावरील चर्चा आणि संशोधनांचे सादरीकरण  दुसऱ्या दिवशी झाले. ‘    समावेश ‘ संस्थेचे सचिव अन्वर जाफरी अध्यक्षस्थानी होते. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यंाचे सल्लागार अमीर उल्लाह खान यांनी या चर्चेच्या समन्वयाचे  काम पाहिले.
टाटा ट्रस्टस् चा सामाजिक पुढाकार असलेल्या  विकासान्वेष फाऊंडेशन संस्थेतर्फ ही
‘ रुरल इंडिया ‘ ही द्वीतिय वार्षिक परिषद वारजे येथील ‘ बाएफ ‘ संस्थेच्या सभागृहात सुरू आहे.
 प्रा.मलिका मिस्त्री ( पूना कॉलेज ), सुमन आचार्य ( विकासान्वेश फाऊंडेशन ), पार्थ सारथी बॅनर्जी ( संशोधक ), अमजद खान ( ब्रेन ट्रस्ट कन्सलटेशन ) , अर्चना लोंढे ( हैदराबाद ) मार्टिन राभा(दिया फाऊंडेशन, आसाम ) , सुमीत स्वामी, सुरभी काझी सहभागी झाले. संजीव फणसळकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रशासन ,राजकारण, शिक्षण क्षेत्रात मुस्लीम समाजाचे प्रतिनिधीत्व कमी असल्याने मुस्लीम समाजाच्या समस्यांवर तोडगे निघत नाहीत.व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय उच्च शिक्षणाचा खर्च आर्थिक मागास असलेल्या मुस्लीम समाजाला परवडत नाही. असे अहमद खान यांनी सांगीतले. लवकर कमवते होऊन घराला आधार देणे , ही प्राथमिकता मुस्लीम युवकांसमोर असते, असेही अहमद यांनी सांगीतले.
‘साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्याची पायाभूत सुविधांची , सामाजिक, आर्थिक कारणे आहेत. तरुणांमध्ये आखाती देशात जाण्याचे आकर्षण जास्त आहे. खूप प्रमाणात युवतींना शिकल्यानंतर लग्न करून संसार करायचा इतकेच माहित असते ‘, असे विकासान्वेष फाऊंडेशनच्या संशोधक सुमन आचार्य यांनी सांगीतले. त्यांनी मुस्लीम मागास वर्गाच्या कारणांची, योजनातील यश- अपयशाची माहिती दिली.
बंगाली मुस्लीमांमधील शैक्षणिक मागासलेपणाची कारणमीमांसा करणारे संशोधन पार्थ सारथी बॅनर्जी यांनी मांडले. ते म्हणाले, ‘ गरीबी हे मागासलेपणाचे आणि शिक्षणापर्यंत न पोहोचण्याचे कारण आहे ‘.
प्रा.मलिका मिस्त्री म्हणाल्या, ‘ मुस्लीम समाजात मोठया प्रमाणावर दानधर्म होतो, मात्र, शैक्षणिक संस्थांना त्यातून मदत मिळाली पाहिजे. नोकरशाहीचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. वक्फ जमिनींचा उपयोग शैक्षणिक कारणांसाठी करता येईल का , हेही पाहिले पाहीजे ‘.
संशोधक अर्चना लोंढे यांनी तेलंगणातील मुस्लीम समाजाच्या  शैक्षणिक मागासपणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.त्या म्हणाल्या, ‘ मागास, गरीब मुस्लीम बांधवांना मदत करण्यात धनाढय मुस्लीम कमी पडतात. तंत्रशिक्षणावर भर देण्याची आवश्यकता आहे. मार्टन राभा ( आसाम ) यांनीही तेथील स्थितीची माहिती दिली.’
सुरभी काझी म्हणाल्या, ‘ मदरसा हे राहण्याच्या ठिकाणापासून जवळ असल्याने तेथे मुलांना पाठवणे मुस्लीम समाजातील गरीबांना सोपे पडते. प्रचलित आणि आधुनिक शिक्षण तेथे देणे हा एक उपाय आहे. मुस्लीमांकडे सतत संशयाने पाहण्याने त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो.
अमिर उल्लाह खान म्हणाले, ‘ मुस्लीम समाजाचे  उच्च शिक्षणात प्रमाण वाढणे सामाजिक प्रगतीसाठी गरजेचे आहे. शिक्षणातील गळती तसेच समाजात भेदभाव होतो का याचाही अभ्यास झाला पाहिजे. शिक्षणाने प्रगती होते, यावर समाजाचा विश्वास बसणे गरजेचे आहे.आरक्षणाने प्रगती होईल का यावरही संशोधन झाले पाहिजे’.
अन्वर जाफरी म्हणाले, ‘ मुस्लीम समाजाचा आयडेंटी क्रायसिस ,  सच्चर कमिटीच्या शिफारसींचा झालेला उपयोग  संशोधनाचा विषय आहे. त्यावर संशोधन व्हावे. ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.