दलित मतांची दलाली थांबावी :तुषार गांधी

Date:

पुणे :
अनेक दशकांच्या लढ्यानंतरही बहिष्कृत समाजाचे प्रश्न सुटले नसून मनातील जात संपली नाही ,म्हणून व्यापक जातीअंताची आणि परिवर्तनाची लढाई लढावी लागेल ,तसे करताना दलित मतांची दलाली थांबावी ‘ असा सूर आज सायंकाळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ आयोजित परिसंवादात उमटला .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित  ‘जाती संस्था और वर्तमान दलित राजनीती ‘ या विषयावरील परिसंवादाने राष्ट्रपिता गांधी सप्ताह चा समारोप झाला . समारोपाच्या परिसंवादात  महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,गुजरातच्या दलित चळवळीतील युवा नेते जिग्नेश मेवाणी ,जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली ) मधील प्राध्यापक डॉ  मिलिंद आव्हाड सहभागी झाले . अध्यक्षस्थानी डॉ कुमार सप्तर्षी होते .
तुषार गांधी म्हणाले ,’जाती व्यवस्था संपली नाही या विषयावर आज बोलावे लागत आहे ,हीच दुःखदायक गोष्ट आहे . आजही दलित ,मागास समाजावर अत्याचार -अन्याय होत आहेत . आरक्षणाला नावे ठेवली जात आहेत . प्रत्यक्षात दलितांचे शोषण होत असून त्यांच्या मतांची दलाली थांबली पाहिजे . दलितांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत याला दलित राजकारणही कारणीभूत आहे . कोणत्याही एका समाजघटकावर  अन्याय होताना इतर समाजघटक गप्प बसतात ,हेही धक्कादायक आहे  ‘
डॉ मिलिंद आव्हाड म्हणाले ,’भारतातील जात व्यवस्था भांडवली दृष्टीकोनातून झालेली नाही ,तर ती धार्मिक संचितातून झालेली आहे . त्याचे ‘घेट्टोकरण ‘झाले असून ते विवेकाने तोडले पाहिजे . आजही दलितांवर अन्याय होत आहे ,बहिष्कृत समाजाचे ,महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत . काय खावे ,कसे वावरावे असे सांगणारा गंभीर काळ आला आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,खान-पान स्वातंत्र्य संपवले जात आहे ,अशा परिस्थितीत व्यापक परिवर्तनाचा पर्यायी मंच उभा केला पाहिजे . ‘
जिग्नेश मेवाणी म्हणाले ,’गुजरातमधील सबका साथ -सबका विकास ‘ ची कहाणी खोटी आहे . तेथील विकास दलितांना बरोबर घेत नाही . तेथे अदानी ,अंबानी याना पाहिजे एव्हडी जमीन मिळते ,पण दलित भूमिहीनांना सरकारने दिलेली १ लाख १७ हजार एकर जमीन प्रत्यक्षात ताब्यात मिळत नाही ,कारण तेथे सवर्णांनी अतिक्रमण केलेलं आहे . गांधी आणि आंबेडकर यांचे विचार घेऊन वर्णवर्चस्व वादी ,फॅसिस्ट विचारांविरुद्ध रस्त्यावर मोठा लढा उभारावा लागणार आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’जात विरहीत झाल्याशिवाय क्रांतीच्या गोष्टी बोलता येणार नाहीत . डोक्यात जात बसल्याने नवे महापुरुष ,क्रांतिकारक ,नवे विचार स्वीकारले जात नाहीत . अशा परिस्थितीत शांत राहणे हाच एक कट असून  अहिंसक  आक्रमकतेची गरज आहे ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुधारित ‘उडान’ या प्रादेशिक संपर्क योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता,एकूण 28,840 कोटी रूपयांचा निधी मंजूर

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत मातृगौरव...

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...

५०० चौ. फुटाच्या घराला मिळकत कर माफीचे आश्वासन ठरले भाजपची बनवा बनवी,फसवा अर्थसंकल्प – चंदूशेठ कदम यांची टिका

पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला...