बहादुरशहा जफर ही मूर्तिमंत शोकांतिका :शमीम तारिक

Date:

पुणे  :” न किसी की ऒख का नूर हूं,न किसी के दिल का करार हूं,जो किसी के काम न आ सके,मै वो एक मुश्ते-गुबार हूं  ‘  अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे ,मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा  ठरलेले बहादुरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे ‘ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी शुक्रवारी सायंकाळी व्यक्त केली . 

‘रसिक मित्र मंडळ ‘ यांच्यातर्फे शमीम तारिक ( मुंबई ) यांचे मुघल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर आणि जीवनावर   २८ डिसेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला उर्दू ,मराठी काव्य प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला . 
रसिक मित्र मंडळ ‘च्या ‘एक कवी -एक भाषा ‘ उपक्रमातील हे  ६० वे व्याख्यान होते . ‘ रसिक मित्र मंडळ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात डॉ . मुमताज मुनव्वर पीरभॉय यांच्या ‘अंदाज -ए -बयाँ और . . ‘ या पुस्तकाचे प्रकाशन शमीम तारिक यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी प्रदीप निफाडकर ,मुनव्वर पीरभॉय ,रफिक काझी  उपस्थित होते . 

शमीम तारिक यांनी प्रतिकूल ,विपरीत परिस्थितीत जगलेल्या ,मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशहा ठरलेल्या बहादुरशहा जफर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . अनेक प्रसंग जिवंत केले . 

 इंग्रजांनी बहादुरशहाला ‘पातशाह’ असा किताब देऊन त्याला नामधारी बादशहा बनवले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये बहादूरशहा सामील झाला. क्रांतिकारकांनी इंग्रजांकडून दिल्ली काबीज केली व बहादूरशहास बादशहा म्हणून जाहीर केले.१३३ दिवसांनंतर दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो,”दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की ! ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!”

त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब पुढील ९० वर्षांचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारा मंत्र ठरला. “गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की ! तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!” (जो पर्यंत धर्मवीरांच्या हृदयात राष्ट्रनिष्टेचा सुगंध दरवळत राहील, तो पर्यंत हिंदुस्थानच्या समशेरीचे पाते लंडनच्या तख्ताचा रोख घेतच राहील.)

बादशहावर खटला भरून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. बहादुरशहाला ब्रह्मदेशातील रंगून येथे कैदेत ठेवण्यात आले. तेथील तुरूंगातच ७ नोव्हेंबर १८६२ साली त्यांचे निधन झाले.

 आणि एक जिवंत शोकांतिका संपली . 

 
शमीम तारिक यांनी जफर यांच्या  ‘मेरा रंग रूप बिगड गया ‘  या प्रसिद्ध ओळींमागचा इतिहासही सांगितलं . जेंव्हा इंग्रजानी दिल्लीवर कब्जा केला व बहादूरशहाला पदच्युत करून दिल्ली सोडुन जायला सांगितले .या परिस्थितीत बहादुरशहाने ही गझल लिहिली. ‘मेरा रंग रूप बिगड गया,मेरा यार मुझसे बिछड गया ‘ . या गझलेतील  ‘मेरा यार ‘ हा उल्लेख जफर  हे  लाल किल्ल्याला उद्देशुन करतात . आपले राज्य गमावलेल्या, आपल्या प्रिय दिल्ली व लालकिल्ला सोडुन जायला लागलेल्या पराभुत बादशहाची प्रतिमा डोळ्यासमोर आणली की जफर यांचे जीवन ही मूर्तिमंत शोकांतिका होती ,असे वाटून जाते . जफर यांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अनेक गझला या आपल्या आहेत असे दावे केले जातात ,तेव्हा जफर यांची शोकांतिका अधिक गहिरी होते ,असेही शमीम तारिक म्हणाले .
‘लालकिला ‘चित्रपटात  महमद रफी यांनी ही गझल गायली आहे, कुठलेही तालवाद्य नसताना रफीच्या आवाजाची जादु या गझलेचा दर्द बरोबर आपल्यापर्यंत पोचवते ,अशी माहितीही या वेळी देण्यात आली 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...