पुणे :
ऊसशेती मध्ये ‘पीएसएपी ‘ हे संशोधित तंत्रज्ञान पूरक द्रव्याच्या स्वरूपात दिल्यांनतर १६० टन एकरी विश्वविक्रमी उत्पादन आले असून पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात आणि साखर उद्योगाच्या प्रतिकूल परिस्थितीत ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल अशी माहिती ईशा ऍग्रो सायन्सेस ‘ या संशोधन संस्थेचे संस्थापक आणि कॅटॅलीस्ट सायन्स या शास्त्राचे संशोधक प्रशांत नांदर्गीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या क्रांतिकारी संशोधनाची प्रत्यक्ष उपयुक्तता सिद्ध झाल्यावर माध्यमांसमोर प्रथमच जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार संघात करण्यात आले होते .
सांगली जिल्ह्यातील प्रशांत लटपटे यांनी त्यांच्या सावळजवाडी येथील ऊस शेतीत हे तंत्रज्ञान वापरून १६० टन एकरी ऊस उत्पादन घेऊन विश्वविक्रम केला आहे . हा विश्वविक्रम या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला .
या पत्रकार परिषदेत कॅटॅलीस्ट सायन्स संशोधक प्रशांत नंदर्गीकर ,(‘पीएसएपी ‘ टेक्नॉलॉजी ),डॉ . डी . जी .हापसे (माजी संचालक ,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ),संदीप पाटील (संचालक ,इशा ऍग्रो सायन्सेस प्रा . लि . ),नितीन देशपांडे (सुक्रोटेक इंजिनियरिंग प्रा . लि ),ईशा नंदर्गीकर उपस्थित होते .
नंदर्गीकर म्हणाले ,’ ‘पीएसएपी ‘ म्हणजे ‘पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘ हा मोलेक्युल होय . हे मोलेक्युल बिनविषारी ,पर्यावरण स्नेही उत्पादन पावडर स्वरूपात वापरता येते . हे तंत्रज्ञान साखर उद्योगाला सद्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकते .’पीएसएपी ‘ हे एकरी ४ ते ५ किलो या प्रमाणात वापरता येते . चार ते पाच फवारण्यातून देता येते . ‘पीएसएपी ‘ हे पिकांवर येणाऱ्या जैविक ,अजैविक ताणावर काम करते . आंतरिक रोग प्रतिकारक क्षमता वाढवते . त्यामुळे पीक सक्षम होते आणि उसाची गुणवत्ता वाढते . याचे कोणत्याही पिकावर दुष्परिणाम होत नाहीत .
१४ वर्षांपूर्वी ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ प्रशांत नंदर्गीकर यांनी शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर फॉस्फरसला कॅटॅलिटिक तंत्राने ऍक्टिव्हेट केले . नंतर त्याला स्प्लिट करून पोटॅश जोडला . चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने या मोलेक्युल चा उदय झाला . ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा प्रथम वापर ‘प्रोफाईट ‘ नावाने नाशिकमध्ये द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला . आता हे तंत्र द्राक्ष ,डाळिंब उत्पादक शेकतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे .
‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर ६ वर्षांपूर्वी ‘इशा ऍग्रो सायन्सेस ‘च्या पुढाकाराने उसावर सुरु झाला . ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ४ वर्षे चाचण्या घेतल्यावर सकारात्मक परिणाम दिसले . पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच उत्तर प्रदेश गन्ना अनुसंधान केंद्र येथे ३ वर्षे ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला . प्रति एकर ५ किलो ‘पीएसएपी ‘ वापरून सर्वसाधारण १० टन वाढीव ऊस उत्पादन आणि ०. ३ टक्क्याने साखर उतारा वाढल्याचे नोंद झाले आहे .
प्रशांत लटपटे यांना राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली . लटपटे यांनी ७७ गुंठ्यांमध्ये या तंत्राचा वापर केला . आजमितीस त्यांना एकरी १६० टन ऊस उत्पादन मिळाले आहे . ऊस ५० दिवसांचा झाल्यावर प्रत्येकी ७ दिवसांनी ‘पीएसएपी ‘ फवारणीची सुरुवात केली . एकूण ८ फवारण्या केल्या . ‘पीएसएपी ‘ चा एकूण वापर एकरी १० किलो केला . एकरी उसाची संख्या ३५ ते ४० हजार निघाली . पेऱ्यांची सरासरी संख्या ४८ ते ५५ नोंद झाली . उसाचे सरासरी वजन ३. किलोपासून ६ किलोपर्यंत नोंदले गेले .
अनेक मान्यवर ऊस तज्ज्ञांनी या विक्रमाची नोंद घेतली आहे . महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे ,सांगली विभागाचे उप कृषी संचालक मकरंद कुलकर्णी ,कृषी अधिकारी श्री . मेडीदार,श्री . चव्हाण ,श्री .बडगुजर ,,राहुल माने ,यांनी भेट देऊन विश्वविक्रमी उत्पादनाची नोंद घेतली आणि प्रशंसा केली .
आय . आय .एस . आर . (लखनौ ) येथील डॉ . योगेश थोरात ,डॉ . ज्ञानेश्वर बोरसे ,महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ . विकास खैरे ,डॉ . श्रीहरी हसबनीस ,डॉ . दिलीप काठमाळे ,डी . एस .टी . ए येथील ऊस तज्ज्ञ डॉ . सुभाष शिंदे ,मच्छिन्द्र भोकरे ,बारामती एग्रो चे ऊस विकास अधिकारी प्रवीण भाट ,इशा एग्रो सायन्सेस चे संचालक संदीप पाटील ,मयूर जयस्वाल ,ऊस अधिकारी विजय नवनाळे यांच्या उपस्थितीत डॉ . ज्ञानेश्वर हापसे यांनी १६० टन विश्वविक्रमी ऊस उत्पादन निघाल्याचे नुकतेच जाहीर केले .
पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात साखर उद्योगाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ,त्यातून दिलेला ‘ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘ हा आपण दिलेली भेट ठरणार आहे ,असे नंदर्गीकर यांनी यावेळी सांगितले .
संदीप पाटील म्हणाले ,”पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर आम्ही साखर कारखान्याबरोबर संलग्न काम करून ,त्याचा प्रसार कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांमध्ये करतो . गोदावरी बायो रिफायनरी (समिरवाडी ) या कारखान्या सोबत ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ चे काम सुरु झाले असून पहिल्या टप्प्यात ५ हजार एकर आणि दुसऱ्या टप्प्यात २० हजार एकर क्षेत्रावर ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे .
या संलग्न प्रयत्नामुळे दोन वर्षे अवर्षणात अडकलेला हा कारखाना ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व परिस्थितीत येऊ लागल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ ने हेल्पलाईनची स्थापन केली असून 09372618677 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे .

