गांधीना मारल्यानंतरही गांधी विचारांचा शोध भारतात निरंतर सुरु :प्रा. अपूर्वानंद झा

Date:

पुणे :’गांधीना मारल्यानंतरही त्यांचा, त्यांच्या विचारांचा भारतात निरंतर शोध सुरु आहे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले, भवतालच्या प्रत्येक समस्येला त्यांनी मानवतेचे कोंदण दिले ‘ , असे प्रतिपादन दिल्ली विश्वविद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद झा यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त प्रा. अपूर्वानंद झा (प्राध्यापक, दिल्ली विश्वविद्यापीठ) यांनी ‘गांधी की खोज’ विषयावर व्याख्यान दिले.

हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी येथे झाला.

यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन, संदीप बर्वे, मयुरी शिंदे, अप्पा अनारसे उपस्थित होते.

प्रा.अपूर्वानंद म्हणाले, ‘ महात्मा गांधी ही भारतीय दंतकथा आहे. त्यांना आपण महात्मा समजत असलो तरी एक राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहायला हवे. त्यांनी राजकारणाला रणभूमी न करता नैतिकतेचे आंदोलन केले.
गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यासाठी भारतीयांना जागे केलेच पण भारतीय स्वातंत्र्यलढयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतेचा लढा असे स्वरुप दिले.

अस्पृश्यता विरोध, न्यायाचा शोध, हिंदू – मुस्लीम एकता हे त्यांच्या जगण्याचे महत्वाचे अंग होते. भवतालच्या प्रत्येक समस्येला ते मानवतेचे कोंदण देत होते. प्रत्येक वेळी ते
अंतरात्म्याचा आवाज ऐकत होते.

भारतीय नागरिक,अनुयायी,सहकाऱ्यांकडूनही ते कठोर योगदानाची अपेक्षा करीत. गांधीजींच्या स्वप्नात एक भारत होता, त्या भारताचा ते सतत शोध घेत होते.

अहिंसा ही रणनीती न मानता नीति म्हणून अंगीकारावी असा त्यांचा आग्रह होता.
गांधींजींनी स्वतःसाठी आणि भारतीयांसाठी निवडलेला उच्च नैतिकतेचा मार्ग अत्यंत खडतर होता, हेही त्यांच्या हत्येचे कारण होते का ? असा प्रश्न पडतो. सवर्णांचा क्रोध हेही त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरले.

गांधीजींचे जीवन ही प्रयोगांची साखळी आहे. त्यात यश -अपयशाच्या पलिकडे बरेच काही आहे. गांधींचे अपयश हे त्यांची हाक न ऐकणाऱ्यांचेही अपयश आहे. गांधींचे अपयश आपले अपयश न मानणे , ही आत्मवंचना ठरेल, असेही प्रा. अपूर्वानंद यांनी शेवटी सांगीतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...