पीएम मोदी म्हणाले,’या अर्थसंकल्पाचा एक महत्वपूर्ण पैलू आहे-गरीबांचे कल्याण, प्रत्येक गरीबाकडे पक्के घर असावे.

Date:

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2022

हा अर्थसंकल्प 100 वर्षातून एकदा उद्भवणाऱ्या  महामारीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत विकास, अधिक गुंतवणूक आणि अधिक रोजगाराच्या नव्या संधींनी युक्त अर्थसंकल्प आहे. आणखी एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे, आणि ते आहे हरित रोजगाराचे. हा अर्थसंकल्प तत्कालीन गरजा देखील पूर्ण करतो आणि देशातील युवकांचे  उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित करतो.

मी गेल्या काही तासांपासून पाहत आहे, ज्याप्रकारे या अर्थसंकल्पाचे प्रत्येक क्षेत्रात स्वागत झाले आहे, सामान्य माणसाची जी सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे, त्यामुळे  जनता जनार्दनाची सेवा करण्याचा आमचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता यावी, तंत्रज्ञान यावे, उदा. किसान ड्रोन असेल, ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी असेल, डिजिटल चलन असेल, बँकिंग क्षेत्रात डिजिटल युनिट्स असतील, 5G सेवेचा प्रारंभ असेल, राष्ट्रीय आरोग्यासाठी डिजिटल परिसंस्था असेल; याचा लाभ आपल्या युवा, मध्यम वर्ग, गरीब-दलित-मागास या सर्व वर्गांना मिळेल.

या अर्थसंकल्पाचा एक महत्वपूर्ण पैलू आहे-गरीबांचे कल्याण. प्रत्येक गरीबाकडे पक्के घर असावे, नळातून पाणी पुरवठा व्हावा, शौचालय असावे,  गॅसची  सुविधा असावी या सर्व बाबींवर  विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर आधुनिक इंटरनेट कनेक्टिविटीवरही तेवढाच भर दिला आहे.

भारताचा जो पर्वतीय भूभाग आहे, हिमालयाचा संपूर्ण पट्टा, जिथले जीवन सुलभ व्हावे, तिथून स्थलांतर होऊ नये, याकडे लक्ष देऊन नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर, ईशान्य प्रदेश सारख्या क्षेत्रांसाठी प्रथमच देशात पर्वतमाला योजना सुरु करण्यात येत आहे. ही योजना डोंगरावर वाहतूक आणि कनेक्टिविटीच्या आधुनिक व्यवस्था निर्माण करेल आणि यामुळे आपल्या देशातील जी सीमेवरील गावे आहेत, जिथे वर्दळ वाढणे आवश्यक आहे, जे देशाच्या सुरक्षेसाठी देखील गरजेचे आहे, त्यालाही मोठे बळ मिळेल. 

भारतातील कोट्यावधी लोकांची आस्था, गंगा नदीच्या स्वच्छतेबरोबरच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गंगेच्या किनारी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे गंगा नदीच्या स्वच्छतेचे जे अभियान आहे, त्यामुळे गंगा नदी रसायनमुक्त करण्यात खूप मोठी मदत मिळेल.

अर्थसंकल्पातील तरतूदी हे सुनिश्चित करणाऱ्या आहेत की शेती फायदेशीर असावी, यात नव्या संधी असाव्यात. नव्या कृषी स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधी असावा किंवा मग अन्न प्रक्रिया उद्योगासाठी नवे पॅकेज, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात खूप मदत होईल. किमान हमी भावानुसार खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वा दोन लाख कोटी रुपयांहून अधिक थेट हस्तांतरित केले जात आहेत.

कोरोना काळात एमएसएमई म्हणजे आपल्या छोट्या उद्योगांची मदत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी देशाने सातत्याने अनेक निर्णय घेतले होते. अनेक प्रकारची मदत पोहचवली होती. या अर्थसंकल्पात कर्ज हमी मध्ये विक्रमी वाढीबरोबरच इतर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

संरक्षण क्षेत्राच्या भांडवली खर्चाचा 68 टक्के हिस्सा देशांतर्गत उद्योगांसाठी राखून ठेवण्याचा मोठा लाभ भारताच्या एमएसएमई क्षेत्राला मिळेल. स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे खूप मोठे मजबूत पाऊल आहे. साडे 7 लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक गुंतवणुकीतून अर्थव्यवस्थेला नवी गती मिळण्याबरोबरच छोट्या आणि अन्य उद्योगांसाठी नव्या संधी देखील निर्माण होतील. 

मी अर्थमंत्री निर्मलाजी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे  लोक-स्नेही आणि प्रगतिशील अर्थसंकल्पासाठी खूप-खूप अभिनंदन करतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...