ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाच्या अहवालानुसार घ्या- सर्वोच्च न्यायालय

Date:

नवी दिल्ली- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी पत्रकदेखील जारी केले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रीपल टेस्टची पूर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर व्हाव्यात, अशी भूमिका तत्कालीन राज्य सरकारने घेतली होती. तसेच ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन लढाई लढली जात होती. आज यावर सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

बांठिया आयोगानुसार निवडणुका घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, या अहवालाला अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.

राजकीय मागास का?

राज्यात ओबीसी आरक्षणासाठी 11 मार्च 2022 रोजी जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील इम्पिरिकल डेटा मिळवला. त्याचा अहवाल 7 जुलै 2022 रोजी सादर केला. महाराष्ट्रात 1994 पासून राजकीय आरक्षण लागू झाले. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राखीव जागा ठेवल्या गेल्या. तरीही आजपर्यंत केवळ दोन वेळेसच ओबीसी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ओबीसी समाज अजूनही राजकीयदृष्ट्या मागास असल्याचे आयोगाने म्हटले.

बांठिया आयोगाने जनगणनेनुसार इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या 37 टक्के असल्याचे म्हटले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही लोकसंख्या वेगवेगळी असल्याचे म्हटले आहे. यावरून अनेकांनी विरोधही व्यक्त केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या 50 टक्के आरक्षण मर्यादेत राहून अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण द्यावे. त्यानंतर ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण द्यावे. मात्र, जिथे अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे ओबीसींना आरक्षण देऊ नये, असे बांठिया आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे गडचिरोली, नंदूरबार, पालघर जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षण संपण्याची भीती व्यक्त झाली.

बांठिया आयोगाचा अहवाल वस्तुनिष्ठ नाही. ओबीसींचे सर्वेक्षण न करता लोकसंख्या कमी झाल्याचा दावा केला. हे चुकीचे आहे. मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत 252 जातींचा समावेश केला होता. राज सरकारनेही यात आणखी जाती समाविष्ट केल्या. सध्याही 352 जाती ओबीसींमध्ये येतात. जातींची संख्या वाढूनही लोकसंख्येत घट कशी झाली. मतदाय यादींवरून ओबीसींची लोकसंख्या कशी काय ठरवली जाऊ शकते, असे आक्षेप घेत बांठीया आयोगाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...