विमान प्रवास उद्याेग २०३० पर्यंत भारत जगात पहिल्या क्रमांकावर
नवीदिल्ली – एअर इंडियाच्या ‘पुनर्जन्मा’सोबतच विमान प्रवाशांचेही ‘महाराजा’ युग सुरू होणार आहे. शुक्रवारपासून एअर इंडियाच्या विमानांत ८४ वर्षीय रतन टाटांच्या आवाजात एक ऑडिअो मेसेजसोबत तुमचे स्वागत केले जाईल. नंतर ‘उन्नत भोजन सेवा’ अंतर्गत मोफत जेवण दिले जाईल. ही सेवा टप्प्याटप्प्याने सर्व विमानांत सुरू होईल. गुरुवारी मुंबई-दिल्ली, मुंबई-बंगळुरूसह चार विमानांत तिचा शुभारंभ झाला.. भारतातील विमान प्रवास उद्याेग सध्या १.२ लाख कोटी रुपयांचा आहे. चीन व अमेरिकेनंतर विमान प्रवास क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत भारत जगात पहिल्या क्रमांकावर जाईल.
विमान प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. पुढील ४-६ महिन्यांत देशाच्या विमान उद्योगात नव्या कंपन्यांच्या एंट्रीमुळे दरयुद्ध सुरू होणे अपरिहार्य आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त तिकीट आणि जास्त मार्ग उपलब्धतेच्या रूपात फायदा होईल.
जेट एअरवेज 2; स्वस्तात प्रवास, अधिक मार्ग देणार
जालान-कालरॉक कन्सोर्टियम १३७५ कोटी रुपयांत नवा जीव ओतेल. ५ वर्षांत १०० विमानांचे लक्ष्य. कंपनी १००० कर्मचारी भरती करणार. यामुळे प्रवाशांसाठी जास्त पर्याय उपलब्ध होतील. मार्च २०२२ पर्यंत सुरुवात होईल.
एअर इंडिया; खाणेपिणे व आराम देण्यावर भर
११७ विमानांचा विशाल ताफा आहे. ४४८० राष्ट्रीय, २७३८ आंतरराष्ट्रीय लँडिंग-पार्किंग स्लॉट. बाजारात हिस्सेदारीत इंडिगोनंतर दुसरे स्थानावर आहे. खाण्यापिण्यासह सुविधांवर अधिक लक्ष. २७-३५% मार्केट शेअर मिळवू शकते.
अकासा; कमी भाड्यात सर्व आवश्यक सुविधा
गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत २६० कोटी रु.ची गुंतवणूक केली आहे. पुढील ४ वर्षात ताफ्यात ७० विमाने येण्याची आशा आहे. भाडे कमी होईल. प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा मिळतील. जून २०२२ पर्यंत विमानसेवा सुरू हाेईल.

