Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंडित नेहरूंची “आयडिया ऑफ इंडिया” धोक्यात – पृथ्वीराज चव्हाण

Date:

पुणे – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला खंडप्राय: देश एकसंध रहाणार नाही. देशात लोकशाही टिकणार नाही असा विश्वास जगातील अनेकां नेत्यांना होता. परंतु नेहरूंनी संविधानाच्या निर्मितीतून देश अखंड टिकवून ठेवला आणि एक राष्ट्र म्हणून जगात ओळख निर्माण कऱण्यात महातमा गांधी इतकाच सिंहाचा वाटा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. आयडिया ऑफ इंडियाच्या संकल्पनेतून अधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया नेहरूंनीच घातला. नेहरूंच्या आय़डिया ऑफ इंडियाला आज धोका निर्माण झाला आहे असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे सांगितले.
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ता पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने “पंडित नेहरूंच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन” सारसबागेजवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन करताना चव्हाण बोलत होते. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले. या कार्यक्रमाला माजी आमदार दिप्ती चवधऱी, नीता रजपूत, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, सचिन आडेकर, बाळासाहेब आमराळे शिवाजी केदारी, आदी आजीमाजी पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नेहरूंच्या आयडिया ऑफ इंडियामुळेच देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विज्ञानाधिष्ठीत समाज निर्मिती करण्यासाठी नेहरूंनी प्रयोगशाळा सुरू केल्या. सीएसआयआर औद्योगिक संशोधन परिषदेसारखी सोसायटी निर्माण केली. तिचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून ते १७ वर्षे देशातील सायन्स काँग्रेसला हजर रहून वैज्ञानिकांशी संवाद साधत असत. त्यांनीच आयआय़टी, आयआयएम सारख्या संस्था निर्माण केल्या. त्यांनी डिसकव्हरी
ऑफ इंड़िया, ग्लिम्स ऑफ वर्ल्ड सारखी पुस्तके लिहून साहित्य निर्मिती केली. त्यांनी उदात्त विचार आणि धेय्य ठेवून वाटचाल केली. प्रत्येक देशवासीसाने पंडितजीच्या विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्रामागे इतिहास दडलेला आहे. राष्ट्र म्हणून वाटचाल कशी सुरू झाली अन पुढे गेली हे यातून अधोरेखीत होते.
या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सध्या देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही सुरू असताना पंडित नेहरूंचे स्मरण होणे अनिवार्य आहे. पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली, टिकवली. गेल्या काही वर्षात सुरू असलेले लोकशाहीचे विद्रुपीकरण बघता लोकशाही देशात कशी जीवंत ठेवता येईल याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. शेवटी आभार प्रदर्शन कमल ज्ञानराज व्यवहारे यांनी केले.
या प्रदर्शनात पंडित नेहरूंच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. देशात पहिल्यांदा 1951 साली आशियायी क्रिडा स्पर्धा नेहरूंना घेतल्या, पुण्यात पूराच्यावेळी दिलेली भेट, शनिवारपेठेतील गाडगीळ वाड्यात नेहरूंच्या उपस्थितीत झालेली बैठक, युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर युद्धभमीवरील सैनिकांची घेतलेली भेट असे अनेक प्रसंग या प्रदर्शनातून उलगडतात. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (दि.15) नागरीकांसाठी सणस मैदाना समोरील कै. बाळासाहेब ठाकरे कलादालनात दिवसभर खुले रहाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...