Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंडित आनंद भाटे व राजेंद्र कंदलगावकर या शिष्यांनी सवाईत पंडितजींना वाहिली सांगीतिक मानवंदना

Date:

पुणे, दि. १८ डिसेंबर २०२२ : पंडित आनंद भाटे यांचे बहारदार गायन आणि त्यानंतर सादर झालेल्या पंडित राजेंद्र प्रसन्ना यांच्या सुरेल बासुरी वादनात रसिक दंग झाले. त्यानंतर राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाने कार्यक्रमात आणखी रंग भरले. गायन आणि वादनाच्या या सुमधुर प्रस्तुतीने पुणेकर रसिकांनी रविवारी एक सुरेल दुपार अनुभविली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी पाचवा व शेवटचा दिवस होता. या दिवसाची सुरुवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने झाली.

महोत्सवात आजपर्यंत मी अनेकदा संध्याकाळचे राग गायले आहे. यंदा मी खास दुपारच्या वेळ निवडली असून, यावेळेत गायनाची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगत त्यांनी
राग वृंदावनी सारंगने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी विलंबित बंदिश ‘तुम रब तुम साहेब ‘, द्रुत बंदिश ‘जाऊ मै तोपे बलिहारी’ सादर केले. त्यानंतर  पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ‘राम रंगी रंगले मन’ ही भक्तीरचना सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा ‘बाजे मुरलिया बाजे’ या गीताच्या तडफडदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली. त्यानंतर ‘मी वसंतराव’ या चित्रपटात समाविष्ट असलेले ‘झाले युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम…’ हे बालगंधर्व आणि सवाई गंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव असलेले मानापमान नाट्यातील पद सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम),  भरत कामत (तबला),  प्रसाद जोशी (पखवाज), ललित देशपांडे व आशिष रानडे (तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ) यांनी साथ केली.

त्यानंतर बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन झाले. पुण्यात बरेचदा आलोय पण आज पहिल्यांदा सवाईत प्रस्तुती करत आहे, असे सांगत त्यांनी राग अलया बिलावल’द्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यामध्ये विलंबित गत, द्रुत गत सादर करत हळूवारपणे या रागाची उकल केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल ( तबला ), राजेश व ऋषभ प्रसन्ना ( बासरी साथ ) नीता दीक्षित ( तानपुरा ) यांनी साथ केली.

तिसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन झाले.

“गुरुजींनी फार कष्ठाने हा कल्पवृक्ष जोपासला आहे. त्या कल्पवृक्षाच्या छत्रछायेत आज आम्ही सर्व कलाकार वृद्धिंगत होत आहोत. कोविडच्या मधल्या काळात ही पंढरीची वारी चुकली, पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे आणि याचा आनंद होत आहे,” असे सांगत त्यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘अब तो भई तेर… ‘ ही विलंबित बंदिश, ‘ मिल जाना राम पियारे… ‘ ही तीन तालातील बंदिश त्यानंतर ‘कटे ना अब बिरहा की रात…’ ही  पिलू रागातील ठुमरी त्यांनी सादर केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..’ या लोकप्रिय भजन प्रस्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना उमेश पुरोहित ( हार्मोनियम), पं. रामदास पळसुले ( तबला), हर्षद डोंगरे व रवी फडके ( तानपुरा), माऊली टाकळकर ( टाळ)  यांनी साथ केली.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...