जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Date:

पुणे, दि.४: जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी ३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ट पूर्तीकरीता सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे आदी प्रकारे सुरु असलेली सर्वप्रकारची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

या विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छता करण्यात येणार आहेत. एक शोषखड्डे असलेले शौचालयाचे दोन शोषखड्डे शौचालयात रुपांतर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनपूर्वक कामे करण्याचे आवाहन मिलिंद टोणपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद पुणे यांनी केले आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...