वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज कनेक्शन तो़डण्याची मोहिम स्थगित करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची आग्रही मागणी

Date:

मुंबई, दि.२२ डिसेंबर- गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात न देता ऐन रब्बी हंगामात विज कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरण कंपनीकडून सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडणी तो़डण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करावी तसेच वीज जोडणी धोरण २०२० मध्ये शेतकरी हिताचे बदल करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विधानपरिषदेमध्ये नियम २८९ अन्वेय विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सूचना मांडली. यावेळी आपली भूमिका मांडताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मागेल त्याला कृषीपंप कनेक्शन, असे आश्वासन दिले असताना, शेतक-यांना नवीन कनेक्शन न देता, उलट जुने कनेक्शन तोडण्याचा सपाटा आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय व वीज बिले न देता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषी पंप विज जोडण्या तोडण्यात आल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. कारण सरकार एका बाजूला विदेशी मद्यावरील 50 टक्के कर कमी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे कृषी पंप वीज जोडण्या तोडणाऱ्या राज्य सरकारच्या या बेदरकार धोरणाविरुद्ध राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी 50 टक्के वीज बिल माफीची घोषणा केली असताना शेतकऱ्यांना अवाजवी जादा वीज देयके देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही दरेकर यांनी केला

शेतक-यांना लागणा-या कृषी पंपासाठी यापूर्वी 3 एचपीसाठी 3 हजार व 5 एचपी 5 हजार रुपये आकारण्यात येत होते,मात्र वीज बिलात वाढ करुन आता 3 एचपीसाठी साडेचार हजार व 5 एचपीसाठी सहा हजार पाचशे रुपये एवढे जादा वीज बिल आकारले जात आहे. महावितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा जाहीर सूचना दिली नसताना त्यांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची बाब दरेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

राज्यात डिसेंबरपर्यंत पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे गेल्‍या दोन वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आगामी रब्बी हंगामाकडून आशा निर्माण झाली आहे. पण रब्बीच्या हंगामात पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपाची जोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेती पंपाच्या थकीत विज बिलांपैकी 67 टक्के विजबिल माफ केल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली. परंतु त्यांची अंमलबजावणीही सरकारने केली नाही व शेतक-यांची वीज जोडण्या सरसकट तोडण्यात आल्याचेही दरकेर यांनी स्पष्ट केले. तसेच शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडून सुरु असणारी वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडण्या तोडण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...