पुणे- पर्वती मित्रमंडळ चौकाजवळील आंबिल ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक सुभाष जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निअदर्श्ने करण्यात आली यावेळी युवा कार्यकर्त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला ..यावेळी महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी,श्वेता होनराव,गणेश मोहिते,सुशांत ढमढेरे,प्रेमराज गदादे,अभिजीत उंद्रे,मिलींद कडभाने,राहुल गुंड,संग्राम होनराव,संतोष पिसाळ,निलेश पवार,प्रमोद कोठावळे,प्रशांत क्षीरसागर,नारायण तेलंग,फारुख शेख,मोहसीन काझी,महेंद्र गावडे,सुशिल कचरे,योगेश पवार,सोनाली उजागरे,प्राजक्ता जाधव,रुपाली बिबवे,विश्वास ननावरे,अजित बाठे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.
पर्वती मित्रमंडळ चौकाजवळील आंबिल ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा,नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येत्या महिनाभरात तो चालु करण्यात यावा,नाही तर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी विधानसभेच्या वतीने अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे येथील कार्याध्यक्ष दिलीप अरुंदेकर यांनी दिला ,नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले पुलाच्या कामाची निविदेची ६ महिने मुदत असुन हि सदर पुलाचे काम ९ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटुन गेला तरी पुर्ण झाले नाही,प्रशासन हे ढिम्मपणे काम करत असुन नागरिकांची होणारी गैरसोय त्यामुळे होत आहे तरी प्रशासनाची कृती किती लाजीरवाणी आहे. पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या महत्तवाची पदे भुषविणारे लोकप्रतिनिधी या प्रभागातील असुन हि सदर पुलाचे काम वर्षभर रखडले आहे,तरी भाजपाचे लोकप्रतिनिधी आपले काम चोखपणे करीत नाहीत, त्यामुळे नागरिकांना अशा त्रासाला नाहक सामोरे जावे लागत आहे.नगरसेविका प्रियाताई गदादे म्हणाल्या जनता वसाहतील घरेलु कामगार,विद्यार्थी,नागरिक यांची खुप रेलचेल या रस्त्यावर असते त्यामुळे त्या सर्वांची मोठी गैरसोय होत आहे

