Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सात वर्षात केवळ मोदींच्या विध्वंसक गोष्टींचे उत्सवच-खासदार कुमार केतकर यांचे प्रतिपादन

Date:

पुणे : “पंडित नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून निवडणूक आयोग, नियोजन आयोग, मतदानाचा अधिकार, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्राची बांधणी केली. विकासाची धोरणे राबवत देशाला आकार दिला. इंदिरा गांधी यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने देशाला सर्वार्थाने सक्षम बनवले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान आत्मसात करत भारताला तरुण व अद्ययावत बनवले. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेल्या विकासाचा, उभारलेल्या संस्थांचा, धोरणांचा विध्वंस करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. खासगीकरण आणि केवळ शब्दांचा खेळ करून गेल्या सात वर्षात मोदी सरकार केवळ विध्वंसक गोष्टींचा उत्सव साजरा करण्यात दंग आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक खासदार कुमार केतकर यांनी केले. मोदी आणि भक्तमंडळी ‘देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारत भ्रष्टाचारमुक्त झाला’, अशा अविर्भावात वावरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. 
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात ‘७० वर्ष आणि ७ वर्ष’ या विषयावरील व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसच्या महाराष्ट्र सह-प्रभारी सोनलबेन पटेल, संयोजक माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कमिटीचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, रफिक शेख, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.
कुमार केतकर म्हणाले, “भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करत काँग्रेसने लोकशाही रुजवण्याचे काम केले. भविष्याचा वेध घेत नेहरूंनी अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर घेऊन जाणारे निर्णय घेतले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवलेल्या योजना, विविध शैक्षणिक-संशोधन, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची उभारणी या काळात झाली. आज या सर्व संस्थांचा, काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासाचा लाभ घेत मोदी आणि त्यांच्या सरकारमधील लोक ‘काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले?’ हा प्रश्न बालिशपणे विचारत आहेत. गांधी-नेहरू कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करताना त्यांचा त्याग ही मंडळी विसरतात, हे दुर्दैव आहे.”
“नियोजन आयोग बरखास्त करणे, सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे, नोटबंदीसारखा निर्णय लादणे अशा कितीतरी विध्वंसक गोष्टी या सात वर्षात झाल्या आहेत. इतिहास आणि भूगोल या दोन्हीचा अभाव असलेले मोदी आज गांधींना चांगले म्हणतात, तर नेहरूंवर टीका करतात. हा दुटप्पीपणा २०२४ नंतर कदाचित संपले आणि ते गांधींवरही टीका सुरु करतील. विध्वंसक गोष्टी अंगाशी येताहेत, असे जाणवले की काँग्रेसवर खापर फोडायचे ही रणनीती आहे. भाजपला, संघालाही मोदी नकोसे आहेत. पण त्यांचा नाईलाज होतोय. खोटी आकडेवारी, लबाड धोरणे राबवून जनतेची फसवणूक करण्याचा सपाटा यांनी लावला आहे. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची नाचक्की झाली आहे. २०१४ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आज झोपले आहेत, अरविंद केजरीवाल यांना जनलोकपालचा विसर पडला आहे,” असेही केतकर यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “काँग्रेसची विकासाची विचारधारा, परंपरा पुढे नेण्याचे काम सोनियाजीनी केले. सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून काम करण्याची संधी देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. काँग्रेस कमिटी, केंद्रात राज्यमंत्री आणि पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करत आले. पंतप्रधान कार्यालयात समन्वय साधण्याची आणि काँग्रेस कमिटीत त्यांना रिपोर्ट करण्याचे काम करायचो. सोनियजींबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. मात्र, त्यांनी कधीही आपली मते लादली नाहीत. पंतप्रधान पदाचा कटाक्षाने त्यांनी सन्मान ठेवला. युपीए आणि मनमोहन सिंग सरकार उभारणीत सोनिया गांधी यांचे मोलाचे योगदान होते. मात्र, त्यांनी कधीही सरकारच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मोदींनी निर्णयप्रक्रियेत एकाधिकारशाही आणली आहे. सात वर्षात सत्तर वर्षाच्या भरीव कामाची वाट लावणाऱ्या या मोदी सरकारला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे.”
प्रास्ताविक मोहन जोशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले. आभार प्रवीण करपे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...