एकीकडे कॉंग्रेसशी आघाडी दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी-सांगा यालाच आघाडी धर्म म्हणता काय ?

Date:

भाजपच्या भ्रष्टाचाराला राष्ट्रवादीचे प्रोत्साहन ?

पुणे-एकीकडे कॉंग्रेस शी आघाडी करून अगोदर भाजपविरोधात शड्डू ठोकायचे आणि नंतर मात्र घुमजाव करत , भाजपशी हातमिळवणी करायची असे वारंवार वर्तन पुणे महापालिकेत शहर राष्ट्रवादीचे वारंवार राहिले आहे .सांगा याला तुम्ही आघाडी धर्म म्हणता काय ? असा खुले आम सवाल शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे .

या संदर्भात बागवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,’ महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले असे विधान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

     गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या ५८ कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. मुख्य सभेमध्ये सत्ताधारी भाजपाने उपसूचना देवून समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यामध्ये समावेश केला. हा विषय मंजूरीसाठी आल्यावर काँग्रेसच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करीत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर प्रस्ताव महानगरपालिकेच्या अहिताचा आहे आणि पुणे शहरावर आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाची पुणे शहराला गरज नसताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरावर आर्थिक भार लादणारा हा प्रस्ताव आहे आणि स्मार्ट सिटीने काढलेल्या निविदांची देखभाल दुरूस्ती पुणे मनपाने करावी असा हा पहिल्याच प्रकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका अनेक सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. काँग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये काँग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले.‌ या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले. या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून अनेक प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील.

      महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले असे विधान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...