रेल्वे पोलीस दल, पश्चिम विभागाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅली साबरमतीकडे रवाना

Date:

मुंबई, 19 जुलै 2022

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून,  पश्चिम रेल्वेने  आज, 19 जुलै 2022 रोजी पश्चिम रेल्वे मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवत मोटरसायकल रॅली आणि ‘रन फॉर युनिटी’ मोहिमेला प्रारंभ केला. या रॅलीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, भावनगर आणि राजकोट या सर्व सहा विभागातील रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ ) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(नरेश लालवानी, पश्चिम रेल्वेचे  वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, पी.सी . सिन्हा, पश्चिम रेल्वेचे  प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वेच्या  मुख्यालयातून मोटरसायकल रॅली आणि रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवताना)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर, पश्चिम रेल्वेचे  वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि पश्चिम रेल्वेचे  प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पी.सी . सिन्हा  यांनी रेल्वे पोलीस दलाच्या  मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.  महात्मा गांधी यांनी ज्या  साबरमती आश्रमापासून प्रसिद्ध दांडी  यात्रेला सुरुवात केली होती त्या ऐतिहासिक  साबरमती आश्रमापर्यंत या  रॅलीला पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

25 दुचाकींवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलातील(आरपीएफ) 50  कर्मचारी  स्वार झाले असून या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही रॅली संजन, वलसाड, बिलीमोरा, नवसारी, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा मार्गे साबरमती आश्रमात पोहोचेल.1 जुलै 2022 रोजी, पश्चिम रेल्वेच्या  सर्व विभागीय मुख्यालयातून मोटार सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, यात मुंबई, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील पश्चिम रेल्वेच्या  कार्यक्षेत्रातील 75 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. त्यानंतर ही  रॅली पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पोहोचली.

पश्चिम रेल्वेच्या  रेल्वे पोलीस दलातील  6500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी  सर्व विभागांमध्ये ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभाग  घेतला असून त्यांनी  18,600 किमी पेक्षा जास्त अंतर कापले आहे, अशी  माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 1 ऑगस्ट 2022 रोजी साबरमती आश्रमामधून पुढे ही  दुचाकी  रॅली निघेल आणि या मार्गावरील महत्त्वाच्या शहरांमधून ही रॅली 14 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोहोचेल आणि समारोप समारंभात सहभागी होईल., असे पश्चिम रेल्वेच्या  मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके ’हा आयकॉनिक सप्ताह

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे 18 ते 23 जुलै 2022 या कालावधीत 75 स्थानके आणि 27 रेल्वेगाड्यांमध्ये “स्वातंत्र्याची रेल्वेगाडी आणि स्थानके” हा आयकॉनिक  सप्ताह साजरा करत आहे.या विशेष गाड्या आणि स्थानके भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे आणि घटना दर्शवतात.या अनुषंगाने,पश्चिम रेल्वे या महोत्सवाच्या सप्ताहाच्या उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे.भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध टप्प्यांमध्ये राष्ट्रीय महत्त्व असलेल्या पोरबंदर, साबरमती, नवसारी, अडस   रोड आणि बारडोली या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांची यासाठी निवड करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या 9 गाडयांना  उदा. लोकशक्ती एक्सप्रेस, आश्रम एक्सप्रेस, साबरमती एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, शांती एक्सप्रेस, गुजरात मेल, अहमदाबाद – नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस आणि वांद्रे टर्मिनस – सूरत इंटरसिटी एक्सप्रेसला स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध स्थानकांवरून हिरवा झेंडा दाखवतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.