15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटी पाण्यात ,मग गरीब जनतेसाठी का नाही ?

Date:

पुणे : भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे पुण्यातील भारती विद्यापीठासह अन्य विद्यार्थांशी संवाद साधताना उपस्थित झालेल्या प्रश्नावर केला . प्रत्येक गरिबाला ७२ हजार रुपये वर्षाला द्यायला कुठून आणणार असा हा प्रश्न होता

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारला. यावर आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘किमान मासिक उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा देशातील 20 टक्के जनतेला होईल,’ असा दावा राहुल यांनी केला होता. या योजनेला काँग्रेसला न्याय (न्यूनतम आय योजना) असं नाव दिलं आहे.

”भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय हवाई दालालाच मिळायला हवे. भारताने हवाई हल्ला करणे आवश्यक होते. भारत हा शक्तिशाली देश आहे हे वेळोवेळी दाखवून देणे गरजेचे आहे आणि ते आपल्या देशाच्या सैन्याने दाखवून दिले. आमचा विरोध फक्त सैन्याच्या नावावर होणाऱ्या राजकारणाला आहे. राजकारण्यांनी एअर स्ट्राईकचे श्रेय घेणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला काही हजार  विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी निवडक प्रश्नांना उत्तरे दिली. भारतात उच्चशिक्षित विद्यार्थांनाही अपेक्षेप्रमाणे मोबदला दिला जात नाही या प्रशांचे उत्तर देताना त्यांनी ”आपली विद्यापीठे ही नोकऱ्यांशी जोडली गेलेली नाहीत, त्यामुळे बोरोजगारीचा मुद्दा उपस्थित होतो,” असे मत व्यक्त केले. ”आपल्याकडे तरुणांच्या कौशल्याला किंमत नाही म्हणून भारत दर दिवसाला 27 हजार नोकऱ्या गमावतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

”तुम्ही मला विचारलेले काही प्रश्न मला आवडणारही नाहीत. मात्र, मी त्यांची उत्तरे देत आहे. माझ्यात तेवढी हिम्मत आहे की मी तुमच्या समोर उभा राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे,” असेही ते म्हणाले.यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाविषयी बोलताना सावध भूमिका घेत माझे लग्न माझ्या कामाशी झाले आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे मलिश्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...