ओबामांनी पुस्तकात लिहिले …भारताच्या राजकारणावर सध्याही धर्म आणि जातीचा प्रभाव

Date:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे पुस्तक ‘ए प्रॉमिस्ड लँड’एका आठवड्यानंतर दुसऱ्यांदा चर्चेत आहे. पुस्तकाच्या एका भागामध्ये सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा उल्लेख आहे. चार दिवसांपूर्वी या पुस्तकाचा अजून एक भाग समोर आला होता.

ओबामांच्या मते, 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन यांच्यावर पाकिस्तानविरोधात हल्ल्यासाठीचा दबाव होता. त्यांनी असे केले नाही. मात्र त्यांना राजकीयदृष्ट्या याचा त्रास सहन करावा लागला. भारतीय जनता पक्ष मजबूत झाला. ओबामांनुसार, भारताच्या राजकारणावर सध्याही धर्म आणि जातीचा प्रभाव आहे. मात्र हे म्हणणे उचित होणार नाही की, याच कारणामुळे मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आले. यामागे वेगळे कारण होते.ते म्हणजे मनमोहन सिंघ हे साठी धोकादायी नव्हते .

ओबामांनुसार, सोनिया गांधींनी मनमोहन सिंह यांना यासाठी पंतप्रधान बनवले, कारण त्यांना वाटत होते की, राहुल गांधींसाठी भविष्यात कोणतेही आव्हान उभे राहू नये, ‘राहुल अशा विद्यार्थ्यासारखे आहे, जो शिक्षकाला इम्प्रेस करण्यासाठी उत्सुक असतो, पण विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा त्यांच्यात नाही. ही राहुल गांधींची कमजोरी आहे.’ ओबामा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ओबामा अखेरच्या वेळी डिसेंबर 2017 मध्ये भारतात आले होते, तेव्हा राहुल त्यांना भेटले होते. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले होते की, ओबामांसोबतची भेट शानदार राहिली.

भारताचा आर्थिक विकास
ओबामांनुसार, 1990 च्या दशकात भारत मार्केट बेस्ड अर्थव्यवस्था होती. मिडल क्लास तेजीने ग्रोथ करत होते. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी लोकांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न केले. त्यांच्याविषयी बोलले जाते की, ते भ्रष्ट नव्हते.

सोनियांच्या हेतूवर प्रश्न
ओबामा लिहितात – अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की सोनिया यांनी मनमोहन यांना खूप विचार करुन पंतप्रधान केले. सिंग यांना कोणताही राजकीय आधार नव्हता. सत्य काहीतरी वेगळेच आहे. खरे तर, सोनियांना आपला 40 वर्षीय मुलगा राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये असे वाटत होते. त्या राहुल यांना काँग्रेसचे नेतृत्त्व सोपवण्यासाठी तयार करत होत्या.

…त्या डिनरची गोष्ट
ओबामांनी एका डिनरचा उल्लेख केला आहे. ओबामांच्या सन्मानासाठी मनमोहन सिंह यांनी डिनरचे आयोजन केले होते. सोनिया आणि राहुल गांधी यांमध्ये सहभागी होती. ओबामा लिहितात – सोनिया बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त पसंत करत होत्या. जसे पॉलिसी मॅटरविषयी बोलले जात गोते तेव्हा त्या आपले बोलणे राहुल गांधींकडे वळवायच्या. आता माझ्यासमोर स्पष्ट झाले होते की, सोनिया इंटेलिजेंट आहेत आणि हे दाखवूनही देतात. राहुल स्मार्त आणि उत्साहित दिसले होते. त्यांनी माझ्या 2008 च्या इलेक्शन कॅम्पेनविषयीही प्रश्न केले.

ओबामांनी पुढे लिहिले – मला माहिती नव्हते की, पदावरुन हटवल्यानंतर मनमोहन सिंह यांच्यासोबत काय होईल. त्या सत्ता राहुल गांधींना सोपवून देतील का? म्हणजे तेच करतील जे राहुलसाठी सोनियांनी ठरवले होते. की, काँग्रेसच्या दबावाला भाजप आव्हान देईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...