१९६७ नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या सीमेवर कुठल्याही सैनिकाने प्राण गमावलेला नाही मग आत्ताच कसे ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Date:

पुणे-भारत-चीन सीमेवर गलवाण खोऱ्यात जर काहीच झालेलं नाही तर आपले २० सैनिक कसे मारले गेले? याच उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं. कुठंही आक्रमण झालं,घुसखोरी झाली असं म्हणायला ते तयार नाहीत. आपली जमीन त्यांनी घेतली असंही म्हणण्यास तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले, हा प्रश्न उपस्थित राहतोच ना? तसेच देशाच्या सीमेवर १९६७ नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या सीमेवर प्राणघातक हल्ला झालेला नाही. कुठल्याही सैनिकाने प्राण गमावलेला नाही. मग आत्ताच्या घटनेची जबाबदारी कोणीतरी स्विकारायला हवी, सगळ्यांनीच हात वर केले आहेत. याचं उत्तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधान यांनी द्यायला हवं.”अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“गलवाण व्हॅली आपलीच आहे त्यामुळं एक इंचही जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घ्यायला हवी. देशाच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा जेव्हा विषय येतो तसेच जेव्हा बाह्य राष्ट्रांकडून आक्रमण होतं तेव्हा आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे ही या देशाची शिकवण आहे. पण सत्यही समोर यायला पाहीजे ना, सत्य न सांगता हे सर्व अशक्य आहे,”

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चेच्या प्रश्नावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आव्हाड म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी बैठकांना एकत्रित बसत आहोत, प्रेमानं वागत आहोत. तसंच आम्ही सध्या चेतना मानसिकतेतून पुढे जात असल्याने मला तरी यात काही दिसत नाही.” तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सरकारच्या कारभारावरील टीकेवर आव्हाड म्हणाले, ‘आज करोना विषाणूचे जागतिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, राज्यातील विरोधीपक्ष नको त्या गोष्टीत राजकारण करू पाहत आहे, असं करून चालणार नाही.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...