Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची अखेर सांगता …

Date:

पुण्यात तब्बल ३१ तास मिरवणुकीचा विक्रम; पोलिसांचा मात्र साडेअठ्ठावीस तासाचा दावा

राजकीय आश्रयामुळेच मिरवणुकीस विलंब

पुणे- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची अखेर सांगता झाली आहे. दरम्यान शेवटचे मंडळ टिळक चौकात आल्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी आपल्यावरील ताण कमी केला.पोलिसांच्या नोंदी नुसार अखिल मंडइ मंडळाचा गणपती आज सकाळी साडेदहा वाजता तर दगडूशेठ गणपती आज सकाळी अकरा वाजून २० मिनिटांनी विसर्जित झाला.पोलिसांनी सांगितले कि, यावेळी एकूण ३५६६ सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती स्थापना करून विसर्जन केले .अनंत चतुर्दशी दिवशी २८४३ मंडळांनी विसर्जन केले बाकी मंडळांनी १० दिवसांच्या आत विसर्जन केले .घरगुती गणपती ची संख्या या वर्षी ५ लाख ५२ हजार ४३२ एवढी होती.अनंत चतुर्दशीला ३ लाख १० हजार ६०१ घरगुती गणपतीचे विसर्जन झाले . इतरांनी अगोदरच्या काळात केले.मानाचा पाचवा गणपती काल रात्री पावणे नऊ वाजता विसर्जित झाला . दरम्यान मानाच्या गणपतींनी विसर्जित होण्याच्या वेळेबाबत केलेल्या विक्रमाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असले तरी पोलिसांनी मात्र त्यावर काही भाष्य केलेलं नाही.लक्ष्मी रस्त्याने २९२ गणेश मंडळांनी आपल्या गणपतीचे मिरवणुकीने विसर्जन केले , हि मिरवणूक सकाळी १० वाजता सुरु झाली होती , मानाच्या ५ व्या गणपतीचे रात्री पावणे नऊ वाजता विसर्जन होणे हे ऐतिहासिक विक्रम नोंदविला गेला आहे. टिळक रोडने १९७ मंडळांनी मिरवणुकीने जाऊन विसर्जन केले तर कुमठेकर रस्त्याने ४८ एवढे तर केळकर रस्त्याने ७१ एवढे गणेश मंडळांनी मिरवणुकीने विसर्जन केले. अलका चौकातून ६०८ मंडळांच्या मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन झाले.

पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा दणदणाटाने अतिधोकादायक पातळी गाठली, असल्याचे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शनिवारा, सकाळी ८ वाजल्यानंतर शरातील काठी भागातील ध्वनिपातळी १२८.५ डेसिबलवर पोहोचली. ही पातळी अतिधोकादायक समजली जाते. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्वच शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला.

मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाची वेळ

कसबा गणपती
बेलबाग चौक – 11:20
अलका चौक – 3:15
विसर्जन – 4:15

तांबडी जोगेश्वरी
बेलबाग चौक – 11:55
अलका चौक – 4:45
विसर्जन – 5:37

गुरुजी तालीम
बेलबाग – 1:30
अलका चौक – 6:15
विसर्जन – 7.27

तुळशीबाग
बेलबाग चौक – 3:30
अलका चौक – 7:30
विसर्जन – 8.01 मिनिटे

केसरी वाडा
बेलबाग चौक – 3:45
विसर्जन – 8.45

पुण्यात तब्बल ३१ तास मिरवणुकीचा विक्रम; पोलिसांचा मात्र साडेअठ्ठावीस तासाचा दावा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी १० वाजता मिरवणूक सुरु होते हे गृहीत धरून यंदाची मिरवणूक ३१ तास चालली.मात्र पोलिसांनी हि मिरवणूक ९ सप्टेंबर रोजी १२ वाजून ४६ मिनिटांनी सुरु झाली आणि १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता संपल्याचे नोंदवून मिरवणुकीची हि एकूण वेळ २८ तास आणि २९ मिनिटे एवढी असल्याचे नोंदविले आहे.

राजकीय आश्रयामुळेच मिरवणुकीस विलंब

काही माध्यमांनी पोलीस आणि मांडले यांच्यातील समन्वयाचा अभाव अशी ओरड विलंब लागण्यामागे असल्याची चालविली आहे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पोलिसांनी मंडळांशी सौम्य आणि आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्याचे दिसले आहे. २ वर्षानंतर उत्सव झाला त्यामुळे खूप उत्साह होता हे हि कारण अनेकांना प्रत्यक्षात रुचणारे नाही .या उत्सवास राजकीय आश्रय प्राप्त झाला होता आणि खुद्द मुख्यमंत्री यांनीच यंदा जोरात गणपती , निर्बंधमुक्त गणेश उत्सवाची घोषणा केली होती त्यामुळे हा उशीर झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...