Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकरी, कष्टकरी यांच्याविषयी सत्ताधाऱ्यांची अनास्था देशाला भोवत आहे-शरद पवार

Date:

पहा –वाचा -आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय म्हटले आहे ….

अच्छे दिन काय आहेत, हे पाहण्यासाठी लोकांनी भाजपला मतदान केले. केंद्रात, राज्यात त्यांचे सरकार आले. शेती हा या देशाचा कणा होता. मागच्या दोन वर्षांत शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात मी अनेक वर्षे शेतीक्षेत्रात लक्ष घातलेले आहे.

१९७८ साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याआधीही मी शेतीचा मंत्री होतो. मुख्यमंत्री झाल्यावरही शेतीचे खाते मी माझ्याकडे ठेवले होते. केंद्रातही १० वर्षे शेतीचे काम मी पाहिले. ज्या वेळी अन्नधान्ये आपण बाहेरून आणत होतो त्या वेळी आपले उत्पादन वाढवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले होते. परदेशातून अन्नधान्ये आणायची आम्ही बंद केले.

मी कृषिमंत्री झालो तेव्हा काही हजार कोटींचा गहू आपण आयात करत होतो. पण मी कृषी खाते सोडले त्या वेळी भारत जगात तांदळाची निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा देश होता. तो द्वितीय क्रमांकावर गव्हाची निर्यात करणारा देश, साखर निर्माण आणि निर्यात करणारा द्वितीय क्रमांकाचा देश झाला होता.

भारतातल्या शेतकऱ्यांनी घाम गाळला, सरकारने त्याच्या मालाला योग्य किंमत दिली, ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली त्यामुळेच अन्नधान्याची टंचाई दूर झाली. असे असतानाही आत्महत्या का होत आहेत? याचे कारण डोक्यावरचे ओझे नंतर वाढले. आम्ही निर्णय घेतला होता की पीककर्ज घ्यायचे असेल आणि तीन लाखांपर्यंत कर्ज घेऊन ते वेळेत परत दिले असेल तर फक्त चार टक्के व्याज घ्यायचे. याच्याही पुढे जाऊन पुणे मध्यवर्ती बँक – ज्याचे नेतृत्व अजित पवार करतात – यांनी वेळेवर कर्ज परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारला. पुणे, सातारा आणि जिथे राष्ट्रवादीचे सहकारी काम करत होते तिथे तिथे वेळेवर कर्जे परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारण्यात आले होते.

पण सध्याच्या सरकारने यात लक्ष घातलेले नाही. शेतीप्रधान देश असूनही या देशातल्या कृषिमंत्र्यांचे नाव कुणाला माहीत नाही. कृषिमंत्र्यांच्या बाबतीत माझी काही वैयक्तिक तक्रार नाही. पण त्या घटकांत काम करणाऱ्या लोकांना विश्वास वाटला पाहिजे की हा नेता माझ्यामागे आहे. आज या विश्वासाची कमतरता आहे, त्यामुळे आज आत्महत्या वाढल्या आहेत.

मी कृषिमंत्री असताना आत्महत्या झाल्या नाहीत, असे मी म्हणत नाही. पण आत्महत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना धीर दिला, त्यांना मदत केली. त्यांच्या डोक्यावरची कर्जे माफ करून त्यांना पुन्हा उभारी देण्याची खबरदारी घेतली.

पण आजचे सरकार हे करताना दिसत नाही. हातात सत्ता असलेल्यांच्या मनात शेतकरी, कष्टकरी यांच्याबद्दल आस्था नाही. त्याचा परिणाम देशात दिसायला लागला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...