सरकार घाबरायला लागलंय म्हणून जमावबंदी -जयंत पाटील

Date:

पाण्याखालील ऊसाला १ लाख रुपये तर भात – नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्या…

पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विद्यार्थाची फी माफ करावी…

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी केली मागणी…

कोल्हापूर दि. १२ ऑगस्ट – सरकार घाबरायला लागलं आहे म्हणून कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश लागू केलाय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत केली.

पूरपरिस्थिती सरकारला हाताळता आली नाही. सरकारची मदत खूप उशिरा पोहोचली. बोटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची होती; पण तसं झालं नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पूर ओसरल्यानंतर राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या घराचे पंचनामे तात्काळ करुन मदत करावी. १० हजार आणि १५ हजाराची मदत अत्यंत तोकडी असून
शेतमजुरांना आता लवकर मजुरी मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतमजुरांना उदरनिर्वाह करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

प्रत्येकाला एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. शिवाय पाण्याखाली गेलेल्या पिकांना तात्काळ मदत करावी. पाण्याखाली असणाऱ्या ऊसाला १ लाख रुपये तर भात आणि नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्यावे अशीही मागणी जयंत पाटील यांनी सरकारकडे केली.

पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. विद्यार्थाची फी माफ करून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

कर्नाटक येथील अलमट्टी धरणातील प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे अशी जोरदार टीका करतानाच पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका सरकारवर ठेवला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...