सैनिकांची कुटुंबे पुणे महापालिकेच्या कारभारावर नाराज , म्हणाले आमची तरी फसगत करू नका -पीसीएमसी कडून काही शिकावे
पुणे- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना मिळकत करातून माफी देण्याचा प्रस्ताव तर महापालिकेने संमत केला पण त्याची अंमलबजावणी कुठे झाली ? पुढे त्याची अंमलबजावणी का होत नाही ? असे सवाल करत किमान माजी सैनिकांच्या भावनांशी तरी खेळू नका आणि तेही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या योजनेद्वारे असे वागणे बरे नव्हे असा सल्ला आता पुणे महापालिकेला सैनिकांच्या कुटुंबांकडून दिला जातोय .
राज्य शासनाने आणि महापालीकेने माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना मिळकत करातून माफी देण्याचा .. म्हणजेच त्यांना मिळकत कर आकारू नये असा निर्णय घेतला आहे . या संदर्भात पुण्यातील माजी सैनिकांच्या संस्था , संघटना आणि अनेक माजी सैनिक आणि त्यांची कुटुंबे महापालिकेला वारंवार विनंती करत आहेत . ठराव तर केला मग आता कर कशाला भरायला लावता , अखेरीस अनेकांनी नाका पेक्षा मोती जड होऊ नये म्हणून कर भरला देखील . अशी पुण्यात स्थिती असताना सोल्जर्स इंडिपेंडंट रीहैब्लीटेशन फौंडेशन (सिर्फ ) चे असे म्हणणे आहे कि,’आमच्या संथेने पुणे महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला .पण महपालिकेच्या ढम्म प्रशासनाने काही दाद दिली नाही . सीमेवर शत्रूला हैराण करणाऱ्यांना आता महापालिका प्रशासनाने हुलकावण्या देऊ नये .या निर्णयाने सुमारे पुण्यातील २० हजार मिळकतदारांना दिलासा मिळणार आहे. २०२१ हे वर्ष केंद्र शासनाने १९७१ च्या युद्धातील भारतीय सैन्याने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सैन्यदलाचा सन्मान , कृतज्ञता व्यक्त करण्याचे निश्चित केलेले आहे . या अंतर्गत असलेल्या या उपक्रमास फक्त पुणे महापालिकाच अपवाद असावी .पुण्यालाग्त च्या पिंपरी महापालिकेने या प्रस्तावाची अंमलबजावणी कधीच सुरु केलेली आहे. महाराष्ट्रातील ९९ टक्के ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी त्यांचे अनुसरण केले आहे .पुण्यात एकूण १६ महत्वाच्या सैनिकी अस्थापना असून हि त्यांच्या प्रती पुणे महापालिकेने दाखविलेले औदासिन्य खेदजनक आहे. साळुंके विहार येथील आर्मी वेल्फेअर को ऑप. हौसिंग सोसायटी ने महापालिकेशी असंख्य वेळा पत्र व्यवहार केला . आश्चर्याची बाब म्हणजे साधा प्रतिसाद देऊनही दाखल महापाल्केने घेतली नाही . आता या पुढे निवडणूक कामकाजाचे किंवा आचारसंहितेचे कारण दिले जाऊ शकते .त्यापूर्वीच ज्यांनी कर भरला आहे त्यांना परतावा द्यावा अथवा पुढील बिलात त्यांची रक्कम वळती करावी आणि अन्य सैनिकांना मिळकतीची सुधारित कर आकारण्यात येत नसल्याची बिले वाटप करावीत अशी मागणी सिर्फ ने केली आहे .

