Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अंदाजे 355 एकर जमिनीचा पुनर्वापर करून शहरी भूभागाचा कायापालट करण्यासाठी 2.6 कोटी मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मुंबईचे उद्दिष्ट

Date:

 मुंबई/नवी दिल्ली; 30 मार्च 2022

घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्राला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 3.7 कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 28 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 433.74 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

वैविध्यपूर्ण आणि दाट लोकसंख्या असलेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1532 एकर जमीनीवर हा  प्रकल्प  पर्यावरणीय संतुलन सुनिश्चित करेल.

राज्यात बृहन्मुंबई क्षेत्रात वर्षानुवर्षे जमलेला सर्वात जास्त  कचरा आहे. ‘लक्ष्य झिरो डंपसाइट’ मिशन अंतर्गत अंदाजे 355 एकर जमिनीचा पुन्हा वापर करून शहरी लँडस्केप मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी 2.6 कोटी मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट आहे.

ठाणे महानगरपालिका शहरातील कचराभूमीत साचलेल्या  8.3  लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे, तर मिरा-भाईंदरने अंदाजे 9 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योजना आखली असून योग्य   वापरासाठी अनेक एकर जमीन पुन्हा ताब्यात घेतली आहे.

वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो आणि वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणात वाढ होते.  हा  जुन्या कचर्‍याचा ढिगारा साफ करणे हे केवळ देशाच्या शहरी परिदृश्य  बदलण्यासाठीच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन-शहरी  2.0 अंतर्गत भारतीय शहरे कचरामुक्त करण्याच्या योजनेची घोषणा केली होती आणि या मिशन अंतर्गत प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ‘लक्ष्य झिरो  डंपसाइट ‘ म्हणजे  शहरातील सुमारे 15,000 एकर जमीनीवरील 16 कोटी टन जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे आहे. ‘कचरामुक्त’ शहरे निर्माण करण्यासाठी शाश्वत स्वच्छता आणि कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे हे स्वच्छ भारत मिशन 2.0 चे ध्येय आहे.

देशभरातील राज्ये आणि शहरांनी धोकादायक जुन्या कचऱ्याचे ढीग असलेली कचराभूमी  स्वच्छ करण्याची वाढती गरज ओळखली आहे. कचरामुक्त शहरांच्या संकल्पनेला बळकटी देत, ‘लक्ष्य झिरो डंपसाइट’ या अभियानांतर्गत विविध शहरांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.

महाराष्ट्रातील 28 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे,  जे स्वच्छ भारत मिशन – शहरी  2.0 च्या अंमलबजावणीसाठी नोडल मंत्रालय आहे, त्यांना कृती आराखडे सादर केले होते, ज्यांना नंतर मंजुरी  देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...